शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

लॉकडाऊनमध्ये साकोलीत रोहयोची कामे जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जास्तीत जास्त रोहयोची कामे सुरु करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्दे२३ हजार मजुरांना काम, कोरोनाच्या सावटातही मजुरीसाठी धडपक

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनामुळे बाहेर गावूह परत आलेल्या मजुरांची संख्या अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा मजुरांचा आकडा अधिकच आहे. सध्या साकोली तालुक्यात २३ हजार ११७ रोजगार हमीच्या कामावर असून कोरोनाच्या सावटातही मजुरांची मजुरीसाठी धडपड सुरु आहे.लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जास्तीत जास्त रोहयोची कामे सुरु करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरु झाली असून मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. साकोली तालुक्यात पारंपारिक शेती व्यवसाय व शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर रोजगाराच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे साकोली तालुक्यातील बहुतांश मजुरांचे दरवर्षीच परराज्यात, परजिल्ह्यात कामाच्या शोधासाठी जात होते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामासाठी मजूर पाहिजे तेवढे मिळत नव्हते. त्यामुळे कामासाठी मजुरांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र यावर्षीची परिस्थिती जरा वेगळीच आहे.कोरोना रोगाच्या भीतीमुळे परराज्यात, परजिल्ह्यात कामासाठी गेलेल्या मजुरांनी आपल्या घराचा रस्ता पकडला व गावी परत आले. मात्र गावात आल्यावर आता त्यांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांना आता रोजगार हमीच्या कामाचा आधार मिळाला आहे. या कामामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोजगार हमीच्या कामावरील मजुरांची संख्या ही अधिकच आहे.त्या मजुरांनाही मिळणार रोजगाराची संधीलॉकडाऊन काळात परप्रांतातून किंवा परजिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजुरांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर कामधंदे उपलब्ध नसल्याने परत आले आहेत. अशा मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध होऊ शकतात. काहींनी याचा लाभही घेण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी करून खात्यातच मजुरीची रक्कम जमा होत असल्याने आर्थिक चणचणही दूर होणार आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत. भंडारा तालुक्यातील ५५, लाखांदूर ४४, लाखनी ६२, मोहाडी ६१, पवनी ६३, साकोली ५० व तुमसर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींनी रोहयोची कामे सुरु केली आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजना