शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयाला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:15 IST

राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकºयांना हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकºयांना हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे पात्र शेतकºयांचे दीड लाख रु पये पर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. एकीकडे शेतकरी हा कर्जमुक्त होत असताना आता तो शेतीवर पूर्णपणे स्वावलंबी कसा होईल, या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.बुधवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत पात्र शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव उपस्थित होते. बडोले म्हणाले, राज्यातील ९० लाख शेतकºयांचा सातबारा या योजनेमुळे कोरा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ८२ हजार २२६ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहे.१५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसा जमा होणार आहे. राज्यात झालेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळत नव्हता. अशी ओरड होती, परंतू या योजनेमुळे पात्र शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना तुलनेत आपल्याकडील शेतकरी कमी प्रमाणात कर्ज घेत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, पात्र शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आरटीजीएसद्वारे जमा होणार आहे. जिल्ह्यातील दीड लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरले. यावेळी बडोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या माणिकलाल लिल्हारे, निलेश धुर्वे, चिंतामन बिसेन, मंगरु रहांगडाले, अंजनाबाई बिसेन, लखनलाल कटरे, केसरबाई चुटे, पुर्णाबाई मानकर, मंगला ऊके, जाईबाई बोरकुटे, गिताबाई कुमरे, भैय्यालाल बिसेन, नकुल नेताम, मोहन नेताम, कौशल्या कुंभरे, हिवराज राऊत, समला कुमरे, सायजा उईके, सुगंधा मडावी, सुखदेव कोरे, सिताराम शेवता, उमाबाई सलामे या शेतकºयांचा शाल, श्रीफळ व मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे कर्जमाफीचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक आटे, सहायक निबंधक सर्वश्री अनिल गोस्वामी, प्रमोद हुमने, नानासाहेब कदम, भानारकर, सहायक सहकार अधिकारी बोरकर उपस्थित होते.