शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रयत्न सुरूच

By admin | Updated: September 24, 2015 00:44 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गावांचा विकास करताना आम्ही भेदभाव केला नाही. मग ते सिंचन प्रकल्पाचे असो किंवा रस्त्याचे असो.

साकोली : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गावांचा विकास करताना आम्ही भेदभाव केला नाही. मग ते सिंचन प्रकल्पाचे असो किंवा रस्त्याचे असो. लोकांंच्या अपेक्षेनुसार कामे करून दाखविली. कधी नव्हे ते सीएसआर फंडाचा निधी या दोन्ही जिल्ह्यात आणून कामावर खर्च केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभीमानाने केलेल्या विकास कामाची माहिती लोकांना द्यावी. आजही आपण जिल्ह्याच्या विकासाकरीता प्रयत्नशील असून कामे करीतच आहे, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी केले.येथील एम.बी. पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. राजेंद्र जैन, सभापती नरेश डहारे, मधुकर कुकडे, अविनाश ब्राह्मणकर, सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, सुरेश कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे, रवी राऊत, पद्माकर गहाणे उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, १६ महिन्यांचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही. बेरोजगारांना रोजगार देणारे, विदेशातून काळा पैसा आणणारे, गरीबी हटविणारे भाजप सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. मच्छिमारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, ऊसाचा प्रश्न, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे काम भाजप सरकार करू शकली नाही.यावेळी तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष प्रदीप मासूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात प्रवेश केला. संचालन प्रभाकर सपाटे यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला अंगराज समरीत, सुरेश बघेल, रामचंद्र कोहळे, जया भुरे, अ‍ॅड. अंग्रपाला शिकादेवी वासनीक, लता दुरूगकर, डॉ. अश्विन शेंडे, राशीद कुरैशी, शारदा वाडीभस्मे, सुदामा वाडीभस्मे, नरेंद्र वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)