शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

जीव मुठीत घेऊन शैक्षणिक प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:51 IST

बस स्थानकावर असलेल्या असुविधा व पडकी इमारत हि प्रवाशाच्या गैरसोयीचे माध्यम आहे. वेळापत्रकानुसार बस धावत नसल्याने शेकडो प्रवाशी खासगी साधनाचा वापर करतात. प्रवाशी असूनही बस थांबत नसल्याने त्रस्त शेकडो विध्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बस पकडावी लागते.

ठळक मुद्देबस स्थानकावर असुविधांचा फटका : विद्यार्थी रस्त्यावर उभे राहून पकडतात बस

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : बस स्थानकावर असलेल्या असुविधा व पडकी इमारत हि प्रवाशाच्या गैरसोयीचे माध्यम आहे. वेळापत्रकानुसार बस धावत नसल्याने शेकडो प्रवाशी खासगी साधनाचा वापर करतात. प्रवाशी असूनही बस थांबत नसल्याने त्रस्त शेकडो विध्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बस पकडावी लागते. शालेय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवाशाबरोबर मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांसाठी होणारी फरफट ही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतेचे परिणाम आहे.वरठी येथून भंडारा, मोहाडी व तुमसर सारख्या शहरात शिक्षणासाठी ५०० च्या वर विध्यार्थी प्रवास करतात. त्याबरोबर येथे शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. नागपूर- गोंदिया महानगरात शिक्षणासाठी वरठीसह परिसरातील इतर गावातील विध्यार्थी व नोकरी निमित्त जाणाºयांची संख्या जास्त आहे. त्यानुसार बस स्थानकावर सुविधा उपलब्ध नाहीत. गावाचे विस्तारलेल्या भागामुळे काही भागातील विध्यार्थ्यांना बस स्थानक दूर तर काही विध्यार्थ्यांना जवळ होते. अशा परिस्तिथी गावात येणाºया बसेस ची संख्या प्रवाशाच्या तुलनेत कमी पडत आहे. बस स्थानक दूर पडत असलेल्या भागातील शेकडो प्रवाशी हे बस स्थानक ते जगनाडे चौक रस्त्यावर उभे राहून बस पकडतात. रेल्वे स्टेशन पलीकडे राहणारे विध्यार्थी व प्रवाशी हे पाचगाव फाट्यावर असलेल्या प्रवाशी थांबा व काही सनफ्लॅग गेट जवळील बस स्थानकावरून बसेस पकडतात.विध्यार्थी व नोकरी धारकांना वेळेचे बंधन असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रवास करणे बंधनकारक ठरते. सकाळी ६ वाजे पासून ते ११ वाजेपर्यंत बस स्थानक व गांधी वार्ड, हनुमान वॉर्ड स्थित प्रवाशी निवारे आणि रस्त्यावर प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गर्दी पाहावयास मिळते. सायंकाळी परतीच्या प्रवाशांसाठी सारखी गर्दी उतरते. नेमका या काळात या मार्गावरून धावणाºया बसेसची संख्या प्रवासाच्या तुलनेत कमी आहे. लांब पल्ल्याचे एस टी बसेस फुल्ल धावत असल्याने प्रवाशांना न घेता भुर्रकन निघून जातात.कोणत्याही परिस्थिती शालेय वेळ सांभाळताना विद्यार्थ्यांची फरफट होते. बस पकडण्यासाठी अक्षरश विध्यार्थी बसच्या मागे धावत सुटताना दिसतात. बस पकडण्यासाठी विध्यार्थ्यांना करावी लागणारी धडपड जीवघेणी आहे. भर रस्तावर उभे राहून शाळा पकडण्यासाठी होणारी सर्कस व घरी परताना पुन: करावी लागणारी कसरत मनस्ताप व यातना देणारी आहे. याबाबद लोकप्रतिनिना कल्पना आहे. अनेक पालक न नागरिकांनी याबाद लोकप्रतिधींकडे साकडे घातले आहेत. पण भावना शून्य लोकप्रतिनिधींना त्यांचे मूल शिकत नसल्यामुळे परिणाम पडताना दिसत नाही.जिल्ह्याच्या नकाशात मनाचे स्थान असणारे वरठी हे गाव लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षतेचे प्रतीक आहे. सत्ताधार्यांना रस्ते नाल्यापलीकडे विकास सुचत नाही. विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी कोमात गेल्यासारखे आहेत. गावातील व्यवस्था व सुविधा याबाद उत्कृष्ठ परिणाम पाहिजे असल्यास सत्ताधारी यांच्या पेक्षा विरोधी पक्ष मजबूत पाहिजे. पण वरठी येथील राजकारण व्हिजनशून्य असल्याने गावाची पुरती वाट लागली आहे. गावातील विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागणार प्रवेश संपणार नसल्याचे संकेत दिसत आहेत.