शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

धामणेवाडाच्या ३० आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण एक वर्षापासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली. मात्र घनदाट जंगलाचा परिसर आणि वन्यप्राण्याची भीती यामुळे  विद्यार्थी येवढ्या लांब शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये असा नियम आहे. मात्र तालुक्यातील आदिवासीबहुल धामणेवाडा गावातील ३० आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण एक वर्षापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गावात पाचवा वर्ग नाही आणि जंगलव्याप्त गावात वाहतुकीची समस्या असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. असे शिक्षण विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली. मात्र घनदाट जंगलाचा परिसर आणि वन्यप्राण्याची भीती यामुळे  विद्यार्थी येवढ्या लांब शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एक वर्षापासून ३० आदिवासी विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. गावात पाचवा मर्ग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थी येण्याकरीता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबविते. परंतु ते केवळ कागदोपत्री असल्याचे धामणेवाडा येथील प्रकारावरून तरी दिसते. जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची मागणी आहे.

जंगलव्याप्त गावात बस सुविधाही बंद- धामणेवाडा या आदिवासी गावात वाहतुकीच्या कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. एसटीबस सुविधाही नाही. सध्या तर बसचा संप सुरू आहे. ग्रामीण भागात आजही बस वाहतूक सुरळीत झाली नाही. पालकांची आर्थिक स्थिती बाहेरगावी ठेवण्याची नाही. दहा ते बारा किमी अंतर सायकलेने जायचे म्हटले तरी शक्य नाही. त्यातच वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम असते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. 

धामणेवाडा गावात जिल्हा परिषदेने पाचवा वर्ग सुरू केला नाही. एक वर्षापासून येथील शाळा नाही तर आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने येथे तत्काळ पाचवा वर्ग सुरू करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. -दिलीप सोनवाणे,माजी सरपंच, चिखला

 

टॅग्स :Educationशिक्षण