शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

धामणेवाडाच्या ३० आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण एक वर्षापासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली. मात्र घनदाट जंगलाचा परिसर आणि वन्यप्राण्याची भीती यामुळे  विद्यार्थी येवढ्या लांब शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये असा नियम आहे. मात्र तालुक्यातील आदिवासीबहुल धामणेवाडा गावातील ३० आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण एक वर्षापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गावात पाचवा वर्ग नाही आणि जंगलव्याप्त गावात वाहतुकीची समस्या असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. असे शिक्षण विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली. मात्र घनदाट जंगलाचा परिसर आणि वन्यप्राण्याची भीती यामुळे  विद्यार्थी येवढ्या लांब शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एक वर्षापासून ३० आदिवासी विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. गावात पाचवा मर्ग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थी येण्याकरीता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबविते. परंतु ते केवळ कागदोपत्री असल्याचे धामणेवाडा येथील प्रकारावरून तरी दिसते. जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची मागणी आहे.

जंगलव्याप्त गावात बस सुविधाही बंद- धामणेवाडा या आदिवासी गावात वाहतुकीच्या कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. एसटीबस सुविधाही नाही. सध्या तर बसचा संप सुरू आहे. ग्रामीण भागात आजही बस वाहतूक सुरळीत झाली नाही. पालकांची आर्थिक स्थिती बाहेरगावी ठेवण्याची नाही. दहा ते बारा किमी अंतर सायकलेने जायचे म्हटले तरी शक्य नाही. त्यातच वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम असते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. 

धामणेवाडा गावात जिल्हा परिषदेने पाचवा वर्ग सुरू केला नाही. एक वर्षापासून येथील शाळा नाही तर आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने येथे तत्काळ पाचवा वर्ग सुरू करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. -दिलीप सोनवाणे,माजी सरपंच, चिखला

 

टॅग्स :Educationशिक्षण