शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

१२८ वर्षे जुन्या जीर्ण इमारतीत विद्यार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:41 IST

शाळा सुरक्षित, प्रसन्न वातावरण, मुलभूत सुविधायुक्त असावी अशी शाळेची संरचना असावी,

मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शाळा सुरक्षित, प्रसन्न वातावरण, मुलभूत सुविधायुक्त असावी अशी शाळेची संरचना असावी, असा आदेश शासनानेच काढला आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी या सहा हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदेची १२८ वर्षे जुनी शाळा इमारत आहे. जिर्ण व आयुष्य संपलेल्या इमारतीत १ ते ७ वर्गातील २०४ विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या शिक्षण विभाग केवळ कागदोपत्री कार्यरत असल्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.तुमसर तालुक्यातील सहा हजार लोकवस्तीचे आष्टी हे गाव आहे. सन १८८९ मध्ये स्वातंत्र्यापूर्वी काळात लोकवर्गणीतून शाळा इमारत बांधण्यात आली होती. शाळेची इमारत इंग्रजी कौलारु आहे. भिंतीना ठिकठिकाणी तडे गेले आहे. कौलारु पडले आहेत. लाकडी फाटे सडून कुजलेले आहेत. अशा धोकादायक जिर्ण व आयुष्य संपलेल्या इमारतीत २०४ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. येथे चिमुकल्यांचा जीव धोक्यात असून अध्ययन करावे लागत आहे.जिल्हा परिषद वर्गखोली वाटपात राजकारण करीत असून उलट सुस्थितीत असलेली इमारत पाडून त्याठिकाणी नविन इमारत तयार केली जाते, असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी केला आहे. प्रत्येक महिन्याला शाळा तपासणी व भेटीकरिता शिक्षण विभागाचे अधिकारी भेट देतात. अहवाल तयार करतात. शाळा धोकादायक असल्याचा अहवाल शासनाकडे अजूनपर्यंत त्यांनी सादर केला नाही. मोठ्या अपघाताची येथे शिक्षण विभाग प्रतिक्षा करीत आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.या शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त असून पदवीधर शिक्षणाचे एक पद रिक्त आहे. दरवर्षी शिक्षण विभाग प्रत्येक महिन्यात संपूर्ण शाळेची आॅनलाईन माहिती मागीत आहे. यात विद्यार्थी संख्या, वर्गखोल्या, शाळेची इमारत, शिक्षकांची संख्या, शाळेतील साधने, मुलभूत सुविधा यांचा समावेश आहे. येथील शाळेला १२८ वर्षे झाली ती शाळा इमारत कशी असेल याबाबत शासनाकडून कधीच विचारणा करण्यात आली नाही. उलट शाळा व्यवस्थापन समितीने सतत १५ वर्षापासून शाळा इमारत जिर्ण झाल्यासंदर्भात शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. पंरतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.जुन्या जिर्ण शाळा इमारत निर्लेखकण करण्याचा नियम आहे, परंतु येथे हा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचे सुध्दा याकडे दुर्लक्ष दिसत आहे. प्रगत शैक्षणिक धोरणाबरोबरच शाळा, सुरक्षित करणे तितकेच महत्त्वाचे आहे.