शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

१२८ वर्षे जुन्या जीर्ण इमारतीत विद्यार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:41 IST

शाळा सुरक्षित, प्रसन्न वातावरण, मुलभूत सुविधायुक्त असावी अशी शाळेची संरचना असावी,

मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शाळा सुरक्षित, प्रसन्न वातावरण, मुलभूत सुविधायुक्त असावी अशी शाळेची संरचना असावी, असा आदेश शासनानेच काढला आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी या सहा हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदेची १२८ वर्षे जुनी शाळा इमारत आहे. जिर्ण व आयुष्य संपलेल्या इमारतीत १ ते ७ वर्गातील २०४ विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या शिक्षण विभाग केवळ कागदोपत्री कार्यरत असल्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.तुमसर तालुक्यातील सहा हजार लोकवस्तीचे आष्टी हे गाव आहे. सन १८८९ मध्ये स्वातंत्र्यापूर्वी काळात लोकवर्गणीतून शाळा इमारत बांधण्यात आली होती. शाळेची इमारत इंग्रजी कौलारु आहे. भिंतीना ठिकठिकाणी तडे गेले आहे. कौलारु पडले आहेत. लाकडी फाटे सडून कुजलेले आहेत. अशा धोकादायक जिर्ण व आयुष्य संपलेल्या इमारतीत २०४ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. येथे चिमुकल्यांचा जीव धोक्यात असून अध्ययन करावे लागत आहे.जिल्हा परिषद वर्गखोली वाटपात राजकारण करीत असून उलट सुस्थितीत असलेली इमारत पाडून त्याठिकाणी नविन इमारत तयार केली जाते, असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी केला आहे. प्रत्येक महिन्याला शाळा तपासणी व भेटीकरिता शिक्षण विभागाचे अधिकारी भेट देतात. अहवाल तयार करतात. शाळा धोकादायक असल्याचा अहवाल शासनाकडे अजूनपर्यंत त्यांनी सादर केला नाही. मोठ्या अपघाताची येथे शिक्षण विभाग प्रतिक्षा करीत आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.या शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त असून पदवीधर शिक्षणाचे एक पद रिक्त आहे. दरवर्षी शिक्षण विभाग प्रत्येक महिन्यात संपूर्ण शाळेची आॅनलाईन माहिती मागीत आहे. यात विद्यार्थी संख्या, वर्गखोल्या, शाळेची इमारत, शिक्षकांची संख्या, शाळेतील साधने, मुलभूत सुविधा यांचा समावेश आहे. येथील शाळेला १२८ वर्षे झाली ती शाळा इमारत कशी असेल याबाबत शासनाकडून कधीच विचारणा करण्यात आली नाही. उलट शाळा व्यवस्थापन समितीने सतत १५ वर्षापासून शाळा इमारत जिर्ण झाल्यासंदर्भात शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. पंरतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.जुन्या जिर्ण शाळा इमारत निर्लेखकण करण्याचा नियम आहे, परंतु येथे हा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचे सुध्दा याकडे दुर्लक्ष दिसत आहे. प्रगत शैक्षणिक धोरणाबरोबरच शाळा, सुरक्षित करणे तितकेच महत्त्वाचे आहे.