शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पशुपालनातून आर्थिक विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे हेक्टरी उत्पनात कमालीची घट आल्याने बळीराजा आर्थीक संकटात आहे. बदलत्या परिस्थितीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयानी आता अत्याधुनिक शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे लक्ष दिल्यास नक्कीच आर्थीक विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले.लाखांदूर तालुक्यातील रोहिणी येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीच्या वतीने आयोजित ...

ठळक मुद्देराजेश काशीवार : रोहणी येथे पार पडला पशुपक्षी मेळावा, शेतकºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे हेक्टरी उत्पनात कमालीची घट आल्याने बळीराजा आर्थीक संकटात आहे. बदलत्या परिस्थितीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयानी आता अत्याधुनिक शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे लक्ष दिल्यास नक्कीच आर्थीक विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले.लाखांदूर तालुक्यातील रोहिणी येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीच्या वतीने आयोजित तालाकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीच्या उद्घाटणीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती कृषी व पशु संवर्धन सभापती नरेश डहारे, पंचायत सतिमी सभापती मंगला बगमारे, न. प. उपाध्यक्ष नरेश खरकाटे, तेजराम दिवटे, ताराचंद मातेरे, जि. प. सदस्य प्रणाली ठाकरे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, नूतन कांबळे, राधेश्याम मुंगमोडे, माजी जि. प. सदस्य वामन बेदरे, हरगोविंद नखाते, न. प. सदस्य रमेश मेहेंदळे, ईश्वर घोरमोडे, विकास हटवार, पं. स. सदस्य शिवाजी देशकर, सदस्य अल्का मेश्राम, सरपंच रोहणी प्रणाली शेंडे, शेषराव हटवार, उमा वझाडे, खंडविकास अधिकारी देवरे, प्र.सहा. आयुक्त पशुसंवर्धन लाखांदूर टंडन, पशु विस्तार अधिकारी लाखांदूर आर. डी. लांजेवार, ए आर हजारे, ए एस वरखडे, आर एस मनवर, एन एस सोनकुसरे, गिहेपुंजे, कंगाले, गोस्वामी, मडावी, चामलाटे, पवार, व शेकडो गावकरी व पशुपालक उपस्थित होते.काशीवार यांनी, शेतकºयांनी केवळ भात पिकावर अवलंबून न राहता मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आस धरल्यास शेती नक्कीच परवडेल, शेती सोबत जोडधंदा शेतकºयासाठी वरदान ठरणारा आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने शेती व पशुपालनासाठी अनेक नवनवीन योजना सुरू केल्या आहेत, या सर्व योजनांचा पुरेपूर फायदा घेतल्यास नक्कीच शेतकºयाचा आर्थीक स्तर उंचावणार असल्याचे ते बोलले.सभापती नरेश डहारे यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया सर्व योजनांचा लाभ घ्यावा. सदर पशु प्रदर्शनी मध्ये विक्रमी ४१२ जनावरांची नोंद करण्यात आली. सुदृढ व निरोगी पशूंची क्रमवारी ठरवून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक ठरवून त्यांना धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक पशु विस्तार अधिकारी लाखांदूर आर डी लांजेवार, संचालन योगेश कुटे यांनी तर आभार डॉ. सोनकुसरे यांनी मानले.