शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतीत ई-मस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:13 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला स्थानिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकासासोबतच मजुरांचे स्थलांतरण थांबण्यात मदत झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ३१७ कुटुंबांनी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली असून सर्वांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरोहयो मजुरी बँकेमार्फत : वेळेत मजुरी वाटपात भंडारा जिल्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख ६७ हजार १७२ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींनी ई-मस्टरचा वापर सुरु केला आहे. मजुरांना त्यांची मजुरी थेट बँकेच्या खात्यातून दिली जात असून वेळेत मजुरी वाटपात भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला स्थानिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकासासोबतच मजुरांचे स्थलांतरण थांबण्यात मदत झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ३१७ कुटुंबांनी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली असून सर्वांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे. सर्व तालुक्यात यावर्षात मजुरांची जास्तीत जास्त मागणी येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. मोहाडी व भंडारा तालुक्यातील मजुरांना स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध होण्यासाठी विशेष लक्ष देऊन सेल्फवर कामे तयार ठेवण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षात जुलै अखेरपर्यंत १ लाख ६७ हजार १७२ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले.ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आलेली कामे घेण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे गावातील कामांची गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील ८७५ ग्रामपंचायतीपैकी सात तालुक्यांमधील ४५२ ग्रामपंचायतीमध्ये ई-मस्टरचा वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांना त्यांची मजुरी बँकेमार्फत देण्यात येते. बँक स्तरावरील विलंब टाळण्यासाठी सातही तालुक्यात ईएफएमएस प्रणालीद्वारे मजुरांची रक्कम बँक खाते आधारशी सलग्न करून खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता व मजुरांना विहित मुदतीत त्यांच्या खात्यात मजुरी जमा होत आहे. मजुरांचे आर्थिक शोषण थांबविण्यास यामुळे मदत होत आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोहयोच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या ११ कामांना प्राधान्यमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभांची ११ कामे प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात सिंचन विहिरी, शेततळे, व्हर्मीकंपोस्टींग, नॅडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, निर्मल शौचालय, शोषखड्डे, समृद्ध गावतलाव, जलसंधारण, अंकुर रोप वाटीका, वृक्षलागवड आणि ग्राम सबळीकरणांतर्गत क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, गावांतर्गत रस्ते, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड आदी कामांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी अधिक लाभदायक ठरणार असल्याने त्यांच्या आर्थिक विकासात नक्कीच भर पडणार आहे. वैयक्तीक लाभाच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वत: मजूर म्हणून काम करणे आवश्यक आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत