शहरं
Join us  
Trending Stories
1
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
2
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
3
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
4
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
5
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
6
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
7
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
8
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
9
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
10
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
11
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
12
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
13
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
14
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
15
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
16
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
17
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
18
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
19
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
20
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या निकालानंतर उभारली सांमजस्याची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

अयोध्या प्रकरणाचा काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सकाळी १०.३० वाजतापासून अनेकजण दूरचित्रवाणी संचापुढे बसल्याचे चित्र दिसत होते. सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत होत असल्याचेच दिसून आले. सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत होते. कुणाच्याही चेहऱ्यावर तणाव अथवा भीती दिसत नव्हती.

ठळक मुद्देसर्व व्यवहार सुरळीत । सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचे जिल्हाभर स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर भंडारा शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र सौहार्दाचे वातारण आणि एकोप्याचे वातावरण दिसून आले. जिल्ह्यात सर्वत्र शांतता आणि सर्व व्यवहार दिवसभर सुरळीत सुरू होते. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वांनीच उत्स्फूर्तपणे स्वागत करीत जिल्ह्यात सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र दिसत होते.अयोध्या प्रकरणाचा काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सकाळी १०.३० वाजतापासून अनेकजण दूरचित्रवाणी संचापुढे बसल्याचे चित्र दिसत होते. सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत होत असल्याचेच दिसून आले. सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत होते. कुणाच्याही चेहऱ्यावर तणाव अथवा भीती दिसत नव्हती. सामान्य व्यवहार सुरू होते. शहरातील जिल्हा परिषद चौक, बसस्थानक चौक, त्रिमुर्ती चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, शास्त्री चौक आदी भागातील सर्व दुकाने दिवसभर उघडी होती. व्यवहारही नियमितपणे दिसत होते. नेहमीची वर्दळ बाजारपेठेत दिसत होती.पोलिसांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावला होता. विशेष म्हणजे शुक्रवारपर्यंत पोलिसांनी दोनही समाजाच्या बैठका ठिकठिकाणी घेतल्या. सर्वप्रथम पोलीस ठाणेस्तरावर त्यानंतर विभागीय स्तरावर बैठक घेण्यात आली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी समाजातील विविध घटकांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले होते. तसेच गस्तीसाठी पथकेही तयार केली होती. परंतु जिल्ह्यातील संयमी नागरिकांमुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांवरील ताण शनिवारी आपोआप हलका झाल्याचे दिसत होते. शनिवारी असलेला बंदोबस्त रविवारीसुद्धा कायम राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले.भंडारा शहरासोबतच जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी या तालुक्यातही सर्वांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. जिल्ह्यात कुठेही शांतता भंग होईल, अशी घटना घडली नाही. सोशल माध्यमातही नागरिकांनी अतिशय संयम बाळगल्याचे शनिवारी दिवसभर दिसून येत होते.श्रीराम मंदिरात आरतीअयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर सायंकाळी भंडारा येथील ऐतिहासीक वारसा लाभलेल्या बहिरंगेश्वर देवस्थान परिसरातील श्रीराम मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत विशेष आरती करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर रोकडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम मंदिर परिसरात यानिमित्ताने एक हजार दीप प्रज्वलित करण्यात आले होते. श्रीराम मंदिराच्या परिसरात या दिव्यांनी प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण दिवसभर भाविक या मंदिरात नेहमीप्रमाणे दर्शनाला येत असल्याचे चित्र होते. आरतीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या