शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सितेपार येथे रेतीची डम्पिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे.

ठळक मुद्देगावात दीड एकरात रेतीच रेती : तालुका महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): पोलीस आणि महसुल विभागाचे कारवाईला लाजवेल असे रेतीचे डम्पिंग यार्ड सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात आले आहे. या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे आहे. असा संतापजनक सवाल गावकरी करीत आहेत. परंतु कारवाई होत नसल्याचा आरोप गावात आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे. रेती माफीयांनी डम्पिंग यार्ड तयार करतांना वन विभागाचे झुडपी जंगलाचे क्षेत्र सोडले नाही. ट्रॅक्टर चालकांवर ऐरवी कारवाई करणारी यंत्रणा ट्रक चालक विरोधात कारवाई करीत नाही. सितेपार गावाचे शिवारात दीड एकर जागेत रेतीचा डम्पिंग यार्ड तयार करण्यात आलेला आहे. गावाला या डम्पिंग यार्डनी वेढा घातला आहे. या गावात रिकामी जागा शिल्लक नाही. गावाचे शिवारात प्रवेश करताचे रेती डम्पिंग यार्ड स्वागत करताना दिसून येत आहेत. यानंतर मोहगाव ते सितेपार मार्गावर रस्ता लगत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या यार्डातील रेती थेट रस्त्यावर आली आहे. यामुळे वाहनधारकांचे अपघात सुरु झाली आहे.तामसवाडी हद्दीत उपसा : महसूल पाण्याततामसवाडी गावाचे हद्दीतून रेतीचा उपसा करण्यात येत असला तरी डम्पिंग यार्ड मात्र सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात येत आहेत. या आधी तामसवाडी गावातील नागरिकांनी रेतीची चोरी व डम्पिंग यार्ड विरोधात कारवाई करिता थेट तहसीलदाराचे कार्यालय गाठले होते. परंतु ट्रक विरोधात कारवाई करिता पुढाकार घेत नाही. गरीब आणि सामान्य नागरिक या व्यवसायात नाही. सधन आणि धनाढ्य माफिया या व्यवसायात असल्याने गावकरी भयभीत आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन प्रशानाने माफियांचे समोर नांगी टाकल्याचा आरोप गावात आहे.