शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

सितेपार येथे रेतीची डम्पिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे.

ठळक मुद्देगावात दीड एकरात रेतीच रेती : तालुका महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): पोलीस आणि महसुल विभागाचे कारवाईला लाजवेल असे रेतीचे डम्पिंग यार्ड सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात आले आहे. या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे आहे. असा संतापजनक सवाल गावकरी करीत आहेत. परंतु कारवाई होत नसल्याचा आरोप गावात आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे. रेती माफीयांनी डम्पिंग यार्ड तयार करतांना वन विभागाचे झुडपी जंगलाचे क्षेत्र सोडले नाही. ट्रॅक्टर चालकांवर ऐरवी कारवाई करणारी यंत्रणा ट्रक चालक विरोधात कारवाई करीत नाही. सितेपार गावाचे शिवारात दीड एकर जागेत रेतीचा डम्पिंग यार्ड तयार करण्यात आलेला आहे. गावाला या डम्पिंग यार्डनी वेढा घातला आहे. या गावात रिकामी जागा शिल्लक नाही. गावाचे शिवारात प्रवेश करताचे रेती डम्पिंग यार्ड स्वागत करताना दिसून येत आहेत. यानंतर मोहगाव ते सितेपार मार्गावर रस्ता लगत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या यार्डातील रेती थेट रस्त्यावर आली आहे. यामुळे वाहनधारकांचे अपघात सुरु झाली आहे.तामसवाडी हद्दीत उपसा : महसूल पाण्याततामसवाडी गावाचे हद्दीतून रेतीचा उपसा करण्यात येत असला तरी डम्पिंग यार्ड मात्र सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात येत आहेत. या आधी तामसवाडी गावातील नागरिकांनी रेतीची चोरी व डम्पिंग यार्ड विरोधात कारवाई करिता थेट तहसीलदाराचे कार्यालय गाठले होते. परंतु ट्रक विरोधात कारवाई करिता पुढाकार घेत नाही. गरीब आणि सामान्य नागरिक या व्यवसायात नाही. सधन आणि धनाढ्य माफिया या व्यवसायात असल्याने गावकरी भयभीत आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन प्रशानाने माफियांचे समोर नांगी टाकल्याचा आरोप गावात आहे.