शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात शेतकरी असुरक्षित

By admin | Updated: December 18, 2014 22:49 IST

मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.

भंडारा : मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. मात्र हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शेत शिवारात शेतकऱ्यांंना जाणे कठिण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ?ा प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार डोळ्यादेखत होत असूनही कायद्याने शेतकरी हतबल ठरत आहे. पेरणीपासून तर पिक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करुन संवर्धन करतो. यासाठी त्याला महिण्याकाठी हजारो रुपये खर्च येतो. मात्र वन्यप्राण्याच्या उपद्रवाला शेतकरी रोखण्यास असर्मथ ठरत आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे. शेतीचा कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी, रानडुकरांच्या टोळ्या शेतात घुसून कोवळी रोपे उपटून खातात. थोडीही नजरचूक झाली तरीही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण शेतातील पिक ओरबडतात. हा प्रकार नित्यनेमाचा असल्याने शेतकरी हताश होत आहे.रानडुकरांचा प्रताप याहूनही भयानक आहे. निर्ढावलेले रानडुकरे पिक तुडवून शेताच्या धुऱ्याबांधाची सुद्धा नासधुस करतात. शेताभोवती काटेरी तारेचे कुंपण केले तरीही त्याला न जुमानता शेतात मुसंडी मारतात. सुरुवातीला फटाक्याच्या आवाजाने रानडुकरे पळून जात होती. मात्र आता हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाल्याने डुकरे सरळ शेतात घुसून पिकांची प्रचंड हाणी करीत आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट चाल करुन शेतकऱ्यांवर हल्ला करुन जमखी करीत आहे. दरवर्षी या घटनात वाढ होत आहे. अशावेळी जिवाच्या भितीने शेतकरी शेतीची राखण सोडून घरी राहणे पसंत करीत आहे. यामुळे मात्र रानडुकरांना पूर्ण शेत मोकळे मिळत आहे.वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहेत. तर दुसरीकडे जंगलात दबा धरुन बसलेली हिंस्त्र पशू शेताच्या कडेने चरत असलेल्या गाई, म्हशी, बैल, शेळ्यांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हल्ला चढवून ठार करीत आहेत. कायदा असल्याने शेतकरी काहीही करु शकत नसून मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्यांची मनधरणी करीत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचा तयार नाही. केवळ मोठ्या घटना घटल्या तर अधिकारी घटनास्थळावर येतात. लहानसहान घटनांकडे ते लक्षही देत नाही.वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देताना शेतकऱ्यांच्या पिकाचा विचार करुन त्यांनी शेतशिवारात किंवा गावाकडे भटकू नये यासाठी उपाय योजना आखायला पाहिजे होती. वनविभाग देत असलेल्या तुंटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घातक कायद्यात आता बदल करुन शेतकऱ्यांनाही संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या शेतामध्ये धानाचे पुंजणे रचून ठेवलेले आहेत. यावर रानडुक्कर धुमाकुळ घालत असल्याने हाती येणारे धानपिक नष्ट होत आहेत. आधीच निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. (नगर प्रतिनिधी)