शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी गळतीमुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणीच पाणी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:09 IST

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे.

ठळक मुद्देपाण्याची नासाडी। तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे. सदर पाणी जलवाहिनी लिकेज मधून वाहत असल्याचे समजते. ही पाण्याची नासाडी नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणी जीवन आहे असे म्हटल्या जाते. पाणी वाचवा, पाणी जिरवा अशा म्हणींना आज मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. भर उन्हाळ्यात कोल्हापूरी बांधारा ओव्हरफ्लो वाहत असल्याने येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीजवळ हा जूना कोल्हापूरी बंधारा आहे. बंधाºयाच्या सभोवताल पाण्याचा मोठा हौद तयार झाला आहे. सदर बंधाºयाच्या अलीकडे माडगी रस्त्यावर ही नाल्यात पाण्याचा हौद तयार झाला आहे.बंधारा ओव्हरफ्लो स्थळ व परिसरातून जलवाहिन्या गेल्या आहेत. सदर जलवाहिन्या लिकेज असल्यानेच नाल्यात व बंधाºयात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे नागरिकांना पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागत आहे. हजारो लोकांना पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. अनेक ठिकाणी सेवाभावी लोकांनी पाण्याचे टँकर लावून नागरिकांची तहाण भागवत आहेत.किमान जलवाहिन्या लिकेज दुरुस्त करण्याचे नियोजन करुन पाण्याची नासाडी थांबविण्याची तसदी कुणी घेतांनी दिसत नाही. पाणी मिळणे येथे दुरापस्त असून दुसरीकडे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. हे दृष्य पाहून यंत्रणेची किव येत आहे. सदर रस्त्यावरुन अनेक मोठे अधिकारी जातात. त्यांचे लक्ष या गंभीर बाबीकडे जात नाही काय? हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.कोल्हापूरी बंधाºयाजवळ कोट्यवधीचा पूल बांधकाम सुरु आहे. या पाण्याचा उपयोग पूल बांधकामाकरीता करणे सुरु आहे.भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. येथे जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. संबंधित यंत्रणा येथे गाफील आहे. पाणी वाचवा, पाण्ीा जिरवा यालाच म्हणावे काय? तात्काळ येथे उपाययोजना करावी.- सुधाकर कारेमोरे,शिवसेना, उपजिल्हा प्रमुख तुमसर

टॅग्स :Waterपाणी