शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 7, 2014 23:25 IST

पवनी तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्य धान टाकले आहणेत. पावसाने दडी मारल्याने पऱ्हे वाळले. आवत्या धानाची दु

पावसाची दडी : अच्छे दिन कधी येणार?पालोरा चौ. : पवनी तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्य धान टाकले आहणेत. पावसाने दडी मारल्याने पऱ्हे वाळले. आवत्या धानाची दुबार पेरणी करावी लागत आहे. महागडे धान पिक खरेदी करून वाया गेल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. मात्र भूमिपुत्र म्हणून ओळख असलेले खासदार यांनी शेतीची पाहणी सुद्धा केली नाही. स्वत:ला भूमिपुत्र म्हणून समजणारे खासदार शेतकऱ्यांचे सांत्वन केव्हा करणार? ते मदतीला धावणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मृग नक्षत्रात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. दुकानातून महागडे बि बियाणे आणून पऱ्हे टाकले. एकाएकी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरण्या बिघडल्या. पऱ्हे उन्हामुळे करपले. आज ना उद्या पाऊस येणार म्हणून शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आद्रा नक्षत्र संपत येवूनसुद्धा पाऊस सतत हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणाऱ्या पुढाऱ्यांचे निवडणुकीपासून दर्शन दुर्लभ झाले आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. महागडे धान्य खरेदी करून वाया गेल्यामुळे पुन्हा बियाणे विकत कसे घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणारे पुढारी कुढे गेले, पावसाप्रमाणे त्यांनी सुद्धा दडी तर मारली नाही ना? अशी चर्चेला उत आला आहे. आमदार असताना नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी धानाची पेंढी विधानभवनावर जाळून आमदारीकचा राजीनामा दिला होता. तेव्हाच शेतकऱ्यांनी त्यांना भूमिपुत्राची पदवी दिली होती. आता तर साहेब सत्ताधारी पक्षाचे खासदार झाले आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांची गरज असून आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र खासदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजण्याकरिता भेटी घेण्याची वेळ दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)