शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 7, 2014 23:25 IST

पवनी तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्य धान टाकले आहणेत. पावसाने दडी मारल्याने पऱ्हे वाळले. आवत्या धानाची दु

पावसाची दडी : अच्छे दिन कधी येणार?पालोरा चौ. : पवनी तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्य धान टाकले आहणेत. पावसाने दडी मारल्याने पऱ्हे वाळले. आवत्या धानाची दुबार पेरणी करावी लागत आहे. महागडे धान पिक खरेदी करून वाया गेल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. मात्र भूमिपुत्र म्हणून ओळख असलेले खासदार यांनी शेतीची पाहणी सुद्धा केली नाही. स्वत:ला भूमिपुत्र म्हणून समजणारे खासदार शेतकऱ्यांचे सांत्वन केव्हा करणार? ते मदतीला धावणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मृग नक्षत्रात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. दुकानातून महागडे बि बियाणे आणून पऱ्हे टाकले. एकाएकी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरण्या बिघडल्या. पऱ्हे उन्हामुळे करपले. आज ना उद्या पाऊस येणार म्हणून शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आद्रा नक्षत्र संपत येवूनसुद्धा पाऊस सतत हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणाऱ्या पुढाऱ्यांचे निवडणुकीपासून दर्शन दुर्लभ झाले आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. महागडे धान्य खरेदी करून वाया गेल्यामुळे पुन्हा बियाणे विकत कसे घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणारे पुढारी कुढे गेले, पावसाप्रमाणे त्यांनी सुद्धा दडी तर मारली नाही ना? अशी चर्चेला उत आला आहे. आमदार असताना नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी धानाची पेंढी विधानभवनावर जाळून आमदारीकचा राजीनामा दिला होता. तेव्हाच शेतकऱ्यांनी त्यांना भूमिपुत्राची पदवी दिली होती. आता तर साहेब सत्ताधारी पक्षाचे खासदार झाले आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांची गरज असून आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र खासदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजण्याकरिता भेटी घेण्याची वेळ दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)