शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 7, 2014 23:25 IST

पवनी तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्य धान टाकले आहणेत. पावसाने दडी मारल्याने पऱ्हे वाळले. आवत्या धानाची दु

पावसाची दडी : अच्छे दिन कधी येणार?पालोरा चौ. : पवनी तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्य धान टाकले आहणेत. पावसाने दडी मारल्याने पऱ्हे वाळले. आवत्या धानाची दुबार पेरणी करावी लागत आहे. महागडे धान पिक खरेदी करून वाया गेल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. मात्र भूमिपुत्र म्हणून ओळख असलेले खासदार यांनी शेतीची पाहणी सुद्धा केली नाही. स्वत:ला भूमिपुत्र म्हणून समजणारे खासदार शेतकऱ्यांचे सांत्वन केव्हा करणार? ते मदतीला धावणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मृग नक्षत्रात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. दुकानातून महागडे बि बियाणे आणून पऱ्हे टाकले. एकाएकी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरण्या बिघडल्या. पऱ्हे उन्हामुळे करपले. आज ना उद्या पाऊस येणार म्हणून शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आद्रा नक्षत्र संपत येवूनसुद्धा पाऊस सतत हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणाऱ्या पुढाऱ्यांचे निवडणुकीपासून दर्शन दुर्लभ झाले आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. महागडे धान्य खरेदी करून वाया गेल्यामुळे पुन्हा बियाणे विकत कसे घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणारे पुढारी कुढे गेले, पावसाप्रमाणे त्यांनी सुद्धा दडी तर मारली नाही ना? अशी चर्चेला उत आला आहे. आमदार असताना नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी धानाची पेंढी विधानभवनावर जाळून आमदारीकचा राजीनामा दिला होता. तेव्हाच शेतकऱ्यांनी त्यांना भूमिपुत्राची पदवी दिली होती. आता तर साहेब सत्ताधारी पक्षाचे खासदार झाले आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांची गरज असून आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र खासदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजण्याकरिता भेटी घेण्याची वेळ दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)