३२८ लक्ष्य : १२५ बांधकाम पूर्णमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यात शासकीय निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांच्या विहीरींचे बांधकाम सध्या रखडले आहे. ३२८ विहीरींचे लक्ष्य होते. त्यापैकी प्रत्यक्षात १२५ विहींरीची कामे शेतकऱ्यांनी आपल्याजवळील पैसा खर्च करुन सुरु केली होती. आता या शेतकऱ्यांना बांधकाम बंद करण्याची वेळ आली आहे. तुमसर तालुक्यात ३२८ विहीरींचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. त्यापैकी १२५ विहीरींची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली. शासनाने येथे आगाऊ पैसे दिले नव्हते. स्वत:जवळील पैसे खर्च करुन शेतकऱ्यांनी विहींरीचे बांधकाम सुरु केले. प्रत्येक शेतकऱ्याने २० ते ३० हजार रुपये स्वत:चे खर्च केले. मजुरांची मजूरी व खोदकामाचा खर्च त्यावर करण्यात आला.सिंचन विहीरी पावसाळयापूर्वी तयार होतील असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांजवळ आता पैसा नाही. शासनाने आतापर्यंत या शेतकऱ्यांना एक दमडीच्या निधी दिला नाही. विहीर खोदकाम व बांधकाम शेतकऱ्यांनी बंद केले आहे. शासनाने निधी का देत नाही हा मोठा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. तीन लाखाची ही विहीर आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. परंतु निधीअभावी येथे विहीरींचे बांधकाम रखडले आहे. ६०/४० चा या तत्वावर शासन विहीरींच्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करुन देते. विहीरींचे बांधकाम साहित्य खरेदीची फाईल ग्रामपंचायतकडे सादर करण्यात येते. मजूरांचे मस्टर काढल्यावर तसे कागदपत्रे पंचायत समितीकडे सादर केल्यानंतर निधीची प्रक्रीया पूर्ण केल्या जाते. हा संपूर्ण नियमानुसार सोयस्कार येथे पूर्ण करण्यात आला आहे. अस्मानी संकट मागील चार वर्षापासून तुमसर तालुक्यात पडत आहे. आता सुल्तानी संकटाला येथे सामोरे जावे लागत आहे. निधी तात्काळ प्राप्त करुन द्यावा याकरिता येथील शेतकरी स्थानिक लोकप्रतिनिधी व पंचायत समिती कार्यालयाच्या खेटा घालत आहेत. परंतु उपयोग होतांनी दिसत नाही. निधी केव्हा प्राप्त होईल असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)
निधीअभावी विहिरींचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:34 IST