शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पावसाने दुष्काळाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:20 IST

करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देधानपीक हातचे गेले : मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले. त्यातच १६ तासाचे भारनियमन, कीड व रोगांचे आक्रमण, जंगल परिसरात वन्यजीवांचा हौदोस यासर्व कारणांमुळे शेतकरी वैतागला आहे. आता दुष्काळाचे सर्व्हेक्षण करण्यास शासनाने पुढाकार घेतला असला तरी मागील अनेक अनुभवाप्रमाणे यावेळीही शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळणार काय, असा प्रश्न आहे.करडी परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धान पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहाडी तालुक्यातील पांजरा, मोहगाव देवी व आंधळगाव येथील धान पिकाची पाहणी केली. परंतु दुष्काळाचा फटका बसलेल्या करडी परिसराकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या पाहणीत त्यांनी धान उत्पादक शेतकºयांच्या शेतीचा सविस्तर सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकºयांना लाभ मिळाला पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे आता प्रत्यक्ष काय लाभ दिला जाणार, याकडेही शेतकºयांचे लक्ष लागून आहेत.टेलवरील शेती दुर्देवीयावर्षी रिसाळा जलाशयात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळेही सिंचनाची सुविधा असलेल्या भागात पाणी पोहचविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यातच पाणी वितरणातील प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळेही टेलवर पाणी पोहचले नाही. करडी परिसरात कोरडा दुष्काळ पडला. धान गर्भावस्थेत असताना व अधिक सिंचनाची गरज असताना भारनियमनाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले. भेगा पडलेल्या शेतीला आठ तासात सिंचनाच्या सुविधा देताना धावपळ झाली. वारंवार खंडीत होणारे भारनियमन यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत त्यानाही पिकाला पाणी देता आले नाही. शेतकºयांवर आपत्तीची कुऱ्हाडच कोसळली.