शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

अपुऱ्या पावसाने दुष्काळाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:20 IST

करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देधानपीक हातचे गेले : मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले. त्यातच १६ तासाचे भारनियमन, कीड व रोगांचे आक्रमण, जंगल परिसरात वन्यजीवांचा हौदोस यासर्व कारणांमुळे शेतकरी वैतागला आहे. आता दुष्काळाचे सर्व्हेक्षण करण्यास शासनाने पुढाकार घेतला असला तरी मागील अनेक अनुभवाप्रमाणे यावेळीही शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळणार काय, असा प्रश्न आहे.करडी परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धान पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहाडी तालुक्यातील पांजरा, मोहगाव देवी व आंधळगाव येथील धान पिकाची पाहणी केली. परंतु दुष्काळाचा फटका बसलेल्या करडी परिसराकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या पाहणीत त्यांनी धान उत्पादक शेतकºयांच्या शेतीचा सविस्तर सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकºयांना लाभ मिळाला पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे आता प्रत्यक्ष काय लाभ दिला जाणार, याकडेही शेतकºयांचे लक्ष लागून आहेत.टेलवरील शेती दुर्देवीयावर्षी रिसाळा जलाशयात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळेही सिंचनाची सुविधा असलेल्या भागात पाणी पोहचविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यातच पाणी वितरणातील प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळेही टेलवर पाणी पोहचले नाही. करडी परिसरात कोरडा दुष्काळ पडला. धान गर्भावस्थेत असताना व अधिक सिंचनाची गरज असताना भारनियमनाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले. भेगा पडलेल्या शेतीला आठ तासात सिंचनाच्या सुविधा देताना धावपळ झाली. वारंवार खंडीत होणारे भारनियमन यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत त्यानाही पिकाला पाणी देता आले नाही. शेतकºयांवर आपत्तीची कुऱ्हाडच कोसळली.