शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

आगीमुळे वन्यजीवांची गावाकडे धाव

By admin | Updated: March 12, 2017 00:41 IST

मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात.

उन्हाळा तापला : वन विभागाने दखल घेण्याची गरज, वनसंपदेचे मोठे नुकसानसाकोली : मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात. तर काही जीव वाचविण्याच्या आकांतात सैरावैरा पळत सुटतात.ते वन्यजीव अनेक वेडा लोकवस्तीचा आश्रय घेतात व त्यांची शिकार केली जाते.जंगलाना आगी लागल्याचे अनेक कारणे सांगितली जातात. ग्रामीण भागात मोहफुल वेचण्यासाठी जाणारे लोक त्या झाडा खालील पालापाचोळा जाळतात. ती आग पसरत जाऊन जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. तसेच जंगलाशेजारी असणारे शेतकरी आपल्या शेतातील धुरे जाळण्यासाठी आगी लावतात. व त्याच्या दुर्लक्षाने ती आग जंगलापर्यंत पसरत जाते. पुढे त्यांचे वनव्यात रूपांतर होते. जंगलांना आगी लागण्याचे तिसरे कारण म्हणजे तंदुपत्ता ठेकेदार जास्त तेंदुपत्ता मिळावा म्हणून जंगलात आगी लावण्याचे अघोरी काम करतात. या तेंदुच्या झाडांची मुळे १३ ते १४ फुट खोलवर गेलेली असतात. त्यामुळे झाडांना दिर्घायुष्य असते. आगी लावण्यात आल्या तर इतर प्रकारची झाडे जळून जातात व या तेदुच्या मुळांना जागोजागी नवे फाटे फुटतात. जंगलाना लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीवांचीच हाणी होते असे नाही तर शासनाचे सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची संपत्ती खर्चुन लावलेली नवीन रोपटे ही या आगीत जळून खाक होतात. इकडे शासनाद्वारे सांगितले जाते दरवर्षी या भागात वृक्षारोपण केले पण या आगीत ते स्वाहा झाले. याची नोंद मात्र नसते.आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी करोडो रुपयांची वनसंपदा व वन्यजीव या आगीत होरपडतात. शासन मात्र काही उपाययोजना करतांना दिसत नाही. जंगलाचा झपाट्याने होणारा ऱ्हास आणि वनव्यामुळे मानव आपल्यावर फार मोठे संकट ओढावून घेत आहे. तसेच जंगलातील प्राणीही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधार्थ गावात येतात किंवा आगी लागल्यामुळे ते गावाकडे धाव घेतात. व शिकारीला बळी पडतात. (तालुका प्रतिनिधी)वनतस्करांची कुऱ्हाडनैसर्गिक संपदेने नटलेल्या साकोली तालुक्यात घनदाट जंगल आहे. मात्र अलीकडे या जंगलातील सागवनासह आडजात वृक्षांवर तस्करांची कुऱ्हाड चालत आहे. वनविभागाची गस्त नाममात्र असल्याने तस्करामध्ये कुणाचेही वचक नाही. परिणामी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट होण्याची भिती निर्माण झाली आहे.