शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे वन्यजीवांची गावाकडे धाव

By admin | Updated: March 12, 2017 00:41 IST

मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात.

उन्हाळा तापला : वन विभागाने दखल घेण्याची गरज, वनसंपदेचे मोठे नुकसानसाकोली : मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात. तर काही जीव वाचविण्याच्या आकांतात सैरावैरा पळत सुटतात.ते वन्यजीव अनेक वेडा लोकवस्तीचा आश्रय घेतात व त्यांची शिकार केली जाते.जंगलाना आगी लागल्याचे अनेक कारणे सांगितली जातात. ग्रामीण भागात मोहफुल वेचण्यासाठी जाणारे लोक त्या झाडा खालील पालापाचोळा जाळतात. ती आग पसरत जाऊन जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. तसेच जंगलाशेजारी असणारे शेतकरी आपल्या शेतातील धुरे जाळण्यासाठी आगी लावतात. व त्याच्या दुर्लक्षाने ती आग जंगलापर्यंत पसरत जाते. पुढे त्यांचे वनव्यात रूपांतर होते. जंगलांना आगी लागण्याचे तिसरे कारण म्हणजे तंदुपत्ता ठेकेदार जास्त तेंदुपत्ता मिळावा म्हणून जंगलात आगी लावण्याचे अघोरी काम करतात. या तेंदुच्या झाडांची मुळे १३ ते १४ फुट खोलवर गेलेली असतात. त्यामुळे झाडांना दिर्घायुष्य असते. आगी लावण्यात आल्या तर इतर प्रकारची झाडे जळून जातात व या तेदुच्या मुळांना जागोजागी नवे फाटे फुटतात. जंगलाना लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीवांचीच हाणी होते असे नाही तर शासनाचे सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची संपत्ती खर्चुन लावलेली नवीन रोपटे ही या आगीत जळून खाक होतात. इकडे शासनाद्वारे सांगितले जाते दरवर्षी या भागात वृक्षारोपण केले पण या आगीत ते स्वाहा झाले. याची नोंद मात्र नसते.आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी करोडो रुपयांची वनसंपदा व वन्यजीव या आगीत होरपडतात. शासन मात्र काही उपाययोजना करतांना दिसत नाही. जंगलाचा झपाट्याने होणारा ऱ्हास आणि वनव्यामुळे मानव आपल्यावर फार मोठे संकट ओढावून घेत आहे. तसेच जंगलातील प्राणीही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधार्थ गावात येतात किंवा आगी लागल्यामुळे ते गावाकडे धाव घेतात. व शिकारीला बळी पडतात. (तालुका प्रतिनिधी)वनतस्करांची कुऱ्हाडनैसर्गिक संपदेने नटलेल्या साकोली तालुक्यात घनदाट जंगल आहे. मात्र अलीकडे या जंगलातील सागवनासह आडजात वृक्षांवर तस्करांची कुऱ्हाड चालत आहे. वनविभागाची गस्त नाममात्र असल्याने तस्करामध्ये कुणाचेही वचक नाही. परिणामी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट होण्याची भिती निर्माण झाली आहे.