शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पराभवाच्या भीतीने दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही.

ठळक मुद्देभाजपच्या आमदारांचा आरोप : नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग

आॅनलाईन लोकमतभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्यां २०१९ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल, या भीतीमुळे नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला असा आरोप भाजपच्या आमदारांनी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन केला.पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर कोणताही फरक पडणार नसल्याचे सांगून आमदार चरण वाघमारे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा हा सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या बळावर २०१४ ची निवडणूक त्यांनी जिंकली. निवडणूक जिंकून आता सरकारवर आरोप करणे तथ्यहीन आहे. केंद्र सरकारने मागील साडेतीन वर्षांत कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली. केंद्राच्या ९८ योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात १९ हजार ५३७ कोटी रूपये जमा केले आहे.परंतु पटोले यांनी या योजनांचा लाभ शेतकरी व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. संसदेत जनतेचे प्रश्न कधीही मांडले नाहीत. त्यामुळे येणारी निवडणूक जिंकणे कठीण वाटत होते. याशिवाय जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपचे आमदार असल्यामुळे विधानसभेचीही उमेदवारी मिळणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे मागील महिन्यांपासून भाजप पक्ष नेतृत्वाविरूद्ध वक्तव्य करणे सुरू केले तेव्हापासूनच पक्षाचा राजीनामा देतील, असे वाटत असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ.उल्हास फडके, मुकेश थानथराटे उपस्थित होते.