शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

पराभवाच्या भीतीने दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही.

ठळक मुद्देभाजपच्या आमदारांचा आरोप : नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग

आॅनलाईन लोकमतभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्यां २०१९ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल, या भीतीमुळे नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला असा आरोप भाजपच्या आमदारांनी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन केला.पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर कोणताही फरक पडणार नसल्याचे सांगून आमदार चरण वाघमारे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा हा सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या बळावर २०१४ ची निवडणूक त्यांनी जिंकली. निवडणूक जिंकून आता सरकारवर आरोप करणे तथ्यहीन आहे. केंद्र सरकारने मागील साडेतीन वर्षांत कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली. केंद्राच्या ९८ योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात १९ हजार ५३७ कोटी रूपये जमा केले आहे.परंतु पटोले यांनी या योजनांचा लाभ शेतकरी व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. संसदेत जनतेचे प्रश्न कधीही मांडले नाहीत. त्यामुळे येणारी निवडणूक जिंकणे कठीण वाटत होते. याशिवाय जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपचे आमदार असल्यामुळे विधानसभेचीही उमेदवारी मिळणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे मागील महिन्यांपासून भाजप पक्ष नेतृत्वाविरूद्ध वक्तव्य करणे सुरू केले तेव्हापासूनच पक्षाचा राजीनामा देतील, असे वाटत असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ.उल्हास फडके, मुकेश थानथराटे उपस्थित होते.