शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:12 IST

गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता.

ठळक मुद्देदुधविक्रेता शेतकºयांवर संकट : शिशुपाल पटले यांना निवेदन, शेतकºयांच्या न्यायासाठी आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता. १२ वर्षानंतर दोन दिवसापूर्वी हा डबा बंद करण्यात आला आहे. यामुळे भंडारा-गोंदियातील नागपूरला दुध विकणाºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांना दुधउत्पादक शेतकºयांनी मागणीचे देऊन रेल्वेचा तो 'डबा' पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. नागपूरच्या बाजारपेठेत दुधाला चांगला भाव मिळतो, म्हणून गोंदिया ते नागपूर या रेल्वेमार्गावरील अंदाजे ५०० तरूण शेतकरी दररोज दुधाचा व्यवसाय करतात. कमीत कमी वेळात व कमी खर्चात नागपूरला दूध नेता यावे, दूध खराब होवून शेतकºयांचे नुकसान होवू नये, दुधाला अधिक भाव मिळावा, यासाठी शेतकºयांच्या मागणीवरून तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुध उत्पादक शेतकºयांसाठी स्वतंत्र डबा रेल्वे मंत्रालयातून मंजूर करवून घेतला होता.गोंदिया, तिरोडा,तुमसर, भंडारा येथील शेकडो शेतकरी याच रेल्वे डब्यातून नागपूरला दुध नेत असत. मात्र कोणतीही सूचना न देता दोन दिवसांपूर्वी हा स्वतंत्र डबा बंद करण्यात आला आहे. शेतकºयांना रेल्वेतून दूध नेण्यास मज्जाव घालण्यात आल्याने या शेतकºयांवर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.स्थानिक बाजारपेठेत दुधाचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये स्वतंत्र डबा देऊन पुन्हा दुध वाहतुकीची परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशा आशयाचे निवेदन माजी खासदार शिशुपाल पटले यांना देण्यात आले.यावेळी लतेश सेलोकर, भावलाल बांडेबुचे, संतोष वहिले, बारस्कर, सखाराम खवास, दिलीप सेलोकर,दिनेश सेलोकर, देवराम सेलोकर, पवन गलबले, धनपाल बारस्कर, सुनिल धार्मिक आदी शेतकरी उपस्थित होते.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरूण शेतकरी रेल्वेतून दुध वाहतूक करून नागपूरला विकत असतात. रेल्वे प्रशासनाकडून त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळायची. हे चित्र पाहिल्यानंतर २००५ मध्ये या भागाचा खासदार या नात्याने शेतकºयांची अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा लावून घेतला होता. तब्बल १२ वर्षानंतर कोणतीही सूचना न देता डबा बंद करण्यात आला. हा अन्याय असून यासंदर्भात सर्वप्रथम रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करून यावर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न करणार आहे. यश आले नाही तर शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर उतरूण संघर्ष करायची तयारी आहे.शिशुपाल पटले, माजी खासदार