शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौरास भागात कोरडवाहू शेतकरी दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: November 24, 2014 22:53 IST

मोदी सरकारने धान शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानासाठी २५०० रूपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने केला होता. परंतु भाव सोडा पण

कोंढा (कोसरा) : मोदी सरकारने धान शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानासाठी २५०० रूपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने केला होता. परंतु भाव सोडा पण अनेक भागात पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यांना मदत करण्याचे सरकार विसरले असा, आरोप चौरास भागातील शेतकरी करीत आहेत.भंडारा जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. धान उत्पादकांना दरवर्षी अनेक संकटाना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. एका एकरला २० हजार खर्च आले पण यावर्षी कोंढा परिसरात चुऱ्हाड, सोमनाळा, पिंपळगाव, नवेगाव, सोनेगाव, विरली खं. भावड, अत्री, फनोली, आकोट या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात नापिकी झाली. पण शासनातर्फे व एकाही लोकप्रतिनिधीनी मदतीसाठी हाक दिली नाही. दरवर्षी नैसर्गीक संकटे येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. धान पेरणीला परिसरात जून महिन्यात सुरवात झाली. तेव्हा पावसाअभावी धानाचे पऱ्हे गेले. दुबार पेरणी करावी लागली. कसेतरी रोवणी शेतकऱ्यांनी केली. नंतर धान काडीवर असताना अचानक पाऊस बेपत्ता झाला. अशावेळी काहीनी इकडूनतिकडून पाणी घेऊन शेतीला पाणी दिले. परंतू पावसाअभावी मोठ्याप्रमाणात नापिकी झाली. ज्यांचे थोडेबहूत धानपिक झाले. त्यांच्या धानाला योग्य भाव मिळत नाही. (वार्ताहर)