शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मालदा गावात पिण्याच्या पाण्याचे संकट; नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:29 IST

Bhandara : ८० कंटुंबाकडे आहे नळ जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर: शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत मागील काही महिन्यांपूर्वी निर्माण सौर ऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजनेच्या दोषयुक्त मोटारपंपामुळे मागील एक महिन्यापासून तालुक्यातील मालदा गावात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. याप्रकरणी शासन व प्रशासनाने तत्काळ दाखल घेऊन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नियमितरीत्या पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन स्थानिक मालदा येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन लाखांदूर पंचायत समितीच्या बीडीओंना देण्यात आले आहे.

तालुक्यातील मुर्झा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालदा गावात ३२५ लोकसंख्या आहे. या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पर्याप्त सुविधा होण्यासाठी मागील २ वर्षांपूर्वी तब्बल २४.८४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित मंजूर या पाणीपुरवठा योजनेचे मागील काही महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

बांधकाम अंतर्गत हर घर जल योजनेनुसार मालदा येथील ८० कुटुंबांना नळ कनेक्शन देखील देण्यात आले आहे. या कनेक्शन अंतर्गत मागील काही महिन्यापर्यंत पाणीपुरवठा योजनेतून नियमितरीत्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र मागील एक महिन्यापूर्वी पाणीपुरवठा योजनेचा बांधकामकर्त्या ठेकेदाराने सौर ऊर्जेवर आधारित मोटारपंप बदलवून अन्य दोषयुक्त मोटारपंप लावल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक महिन्यापासून मालदावासीयांना पाणी पुरवठा योजनेतून पर्याप्त स्वरूपात पिण्याचा पाणी उपलब्ध होत नाही. 

अन्यथा घागर मोर्चा काढणार याप्रकरणी मालदा येथील नागरिकांनी संताप व्यक्त करीत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मागणीनुसार पुढील १-२ दिवसांत आवश्यक कार्यवाही न केल्यास स्थानिक लाखांदूरच्या पंचायत समिती कार्यालयात घागर मोर्चा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या इशाराचे निवेदन लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ खुणे यांना देतेवेळी मंगेश ठाकरे, शुभम नेवारे, तेजस बोकडे, रोहित राऊत, विजय राऊत, दुधराम शहारे, श्रीहरी राऊत, तुरसा नेवारेसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbhandara-acभंडारा