शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी बाहेर काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 23:27 IST

जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने १०० ते १२० दिवसांच्या कालावधीचे धानाची लागवड बऱ्याच प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे निसवे झालेले आहेत. नियमित पावसामुळे बांधात पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पाणी काढल्यास धानाचा बुंदा मजबूत होतो. शक्यतो धान लोळत नाही. लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढल्यास धान पिकावर कीड नियंत्रणासाठी मोठी मदत शक्य असल्याचे मत वर्तवले जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात हलका व मध्यम धानाचा हंगाम आटोपतीला आहे. मात्र, पावसाचा व्यत्यय येत असल्याने ओल्या दुष्काळाची भीती आहे. सतत ढगाळ हवामानामुळे धान पिकावर विविध रोगराईचे सावट आहे. तुडतुडा जोर करीत आहे. शेतकरी बांधवांनी लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढावे, असा सल्ला  कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने १०० ते १२० दिवसांच्या कालावधीचे धानाची लागवड बऱ्याच प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे निसवे झालेले आहेत. नियमित पावसामुळे बांधात पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पाणी काढल्यास धानाचा बुंदा मजबूत होतो. शक्यतो धान लोळत नाही. लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढल्यास धान पिकावर कीड नियंत्रणासाठी मोठी मदत शक्य असल्याचे मत वर्तवले जात आहे.ज्या शेतकऱ्याकडे भारी अर्थात १२० दिवसाच्या पुढचे धान आहेत त्यांच्याकडे स्वतंत्र सिंचन व्यवस्था असते. त्यामुळे त्यांनीसुद्धा पाणी बांधून ठेवू नये. पालांदूर व परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेतात तुडतुड्याची लागण झालेली आहे. कीटकनाशक फवारून लाभ मिळत नसल्याचा सूर शेतकऱ्यांनी ऐकविला आहे. त्यावर कृषी तज्ज्ञांच्या मते, शून्य खर्चातील स्वतःच्या अधिकारातील उपाययोजना करीत तुडतुड्याकरिता प्रयत्न करावे. सिंचन सुविधेतील शेतकऱ्यांनी बांधातील पाणी प्रवाहित ठेवावे.

फवारणीसाठी वापरात येणारा पाणी स्वच्छ असावा. शक्यतो सायंकाळच्या वेळेस फवारणी करावी. शिफारसीनुसार कीडनाशकाची मात्रा व पाण्याचे प्रमाण नियोजित असावे. गरजेपेक्षा कमी-अधिक मात्रेत कीडनाशक फवारू नये. लोंबी आल्यानंतर महिनाभरात ओलाव्याने धान परिपक्व होतो. त्यामुळे बांधात पाण्याची मात्रा  ठेवू नये. नियमितपणे बांधात उतरून पिकाचे निरीक्षण करावे. फवारणी करण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाजसुद्धा लक्षात घ्यावा.-सुधीर धकाते, कृषीतज्ज्ञ, भंडारा.

 

टॅग्स :agricultureशेती