शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी बाहेर काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 23:27 IST

जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने १०० ते १२० दिवसांच्या कालावधीचे धानाची लागवड बऱ्याच प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे निसवे झालेले आहेत. नियमित पावसामुळे बांधात पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पाणी काढल्यास धानाचा बुंदा मजबूत होतो. शक्यतो धान लोळत नाही. लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढल्यास धान पिकावर कीड नियंत्रणासाठी मोठी मदत शक्य असल्याचे मत वर्तवले जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात हलका व मध्यम धानाचा हंगाम आटोपतीला आहे. मात्र, पावसाचा व्यत्यय येत असल्याने ओल्या दुष्काळाची भीती आहे. सतत ढगाळ हवामानामुळे धान पिकावर विविध रोगराईचे सावट आहे. तुडतुडा जोर करीत आहे. शेतकरी बांधवांनी लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढावे, असा सल्ला  कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने १०० ते १२० दिवसांच्या कालावधीचे धानाची लागवड बऱ्याच प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे निसवे झालेले आहेत. नियमित पावसामुळे बांधात पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पाणी काढल्यास धानाचा बुंदा मजबूत होतो. शक्यतो धान लोळत नाही. लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढल्यास धान पिकावर कीड नियंत्रणासाठी मोठी मदत शक्य असल्याचे मत वर्तवले जात आहे.ज्या शेतकऱ्याकडे भारी अर्थात १२० दिवसाच्या पुढचे धान आहेत त्यांच्याकडे स्वतंत्र सिंचन व्यवस्था असते. त्यामुळे त्यांनीसुद्धा पाणी बांधून ठेवू नये. पालांदूर व परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेतात तुडतुड्याची लागण झालेली आहे. कीटकनाशक फवारून लाभ मिळत नसल्याचा सूर शेतकऱ्यांनी ऐकविला आहे. त्यावर कृषी तज्ज्ञांच्या मते, शून्य खर्चातील स्वतःच्या अधिकारातील उपाययोजना करीत तुडतुड्याकरिता प्रयत्न करावे. सिंचन सुविधेतील शेतकऱ्यांनी बांधातील पाणी प्रवाहित ठेवावे.

फवारणीसाठी वापरात येणारा पाणी स्वच्छ असावा. शक्यतो सायंकाळच्या वेळेस फवारणी करावी. शिफारसीनुसार कीडनाशकाची मात्रा व पाण्याचे प्रमाण नियोजित असावे. गरजेपेक्षा कमी-अधिक मात्रेत कीडनाशक फवारू नये. लोंबी आल्यानंतर महिनाभरात ओलाव्याने धान परिपक्व होतो. त्यामुळे बांधात पाण्याची मात्रा  ठेवू नये. नियमितपणे बांधात उतरून पिकाचे निरीक्षण करावे. फवारणी करण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाजसुद्धा लक्षात घ्यावा.-सुधीर धकाते, कृषीतज्ज्ञ, भंडारा.

 

टॅग्स :agricultureशेती