शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हात धुवा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देभुवनेश्वरी एस : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हात धुवून दिला स्वच्छतेचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हात धुवा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी त्या बोलत होत्या.हात धुवा प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) राजेश बागडे, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. शर्मा, शिक्षणाधिकारी आर. एस. काटोलकर, उपजिल्हा कार्यकारी समन्वयक अधिकारी खोब्रागडे यांची उपस्थिती होती.यावेळी भुवनेश्वरी एस. म्हणाल्या, जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे. या आजाराला घाबरून न जाता, सावधानता बाळगण्याची गरज आहे. विषाणू रूग्णाच्या संपर्कात आल्यास या आजाराची शक्यता उदभवू शकते. कोरोना विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानी स्वत: उपाय योजना करून सावधानता बाळगावी. स्वच्छता पाळणे, नियमित हातधुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीतून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून त्यावर मात करता येते. जिल्हा परिषदेमध्ये हातधूण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यामागचा उद्देश अधिकारी कर्मचाºयांच्या माध्यमातून स्वच्छता संदेश सर्वदूर पोहचविण्यासाठी आहे, असे सांगितले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने साबून अथवा हॅण्डवॉशद्वारे हात धुवून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखल्या जावू शकतो, याकरिता स्वच्छतेचे महत्व विषद करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आवारात हातधूण्यासाठी विभाग प्रमुखांना पाचारण करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुखांनी हात धुवून स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहचविण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेकरिता नियमित हात धुवावे व आजाराचा प्रादूर्भाव रोखावी असे आवाहन केले. हातधुण्यासाठी जिल्हा कक्षाचे वतीने हॅण्डवॉश, सॅनिटायझर व नॅपकीनची व्यवस्था करण्यात आलेली होती.जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहनजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती सुरू केली आहे. यासाठी फलेक्सच्या माध्यमातून खबरदारी घेण्याचे आवाहन करून उपाय योजना सांगितले आहेत.कोरोना विषाणूला घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडळला निर्माण होणे आदी लक्षणे सांगून या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी उपाय सांगितले आहेत. बाहेर देशातील कोरोना विषाणू बाधित क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांमध्ये जर लक्षणे आढळली तर त्वरित कॉल सेंटर अथवा आपल्या जवळील शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा. बाधित रूग्णांनी (प्रवासी) मास्कचा वापर करावा, इतर लोकांपासून दूर राहावे, घराबाहेर अधिक काळ वावरू नये, स्वत: उपचार करू नये, डॉक्टराच्या सल्लानुसार उपचार करावा. शिंकताना खोकताना रूमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करावा अशा प्रकारे काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तीच्या विलगीकरणाची व्यवस्था जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हातधुवा कार्यक्रमाकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस