शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

गोलेवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डोंगरगावात स्मशानभूमीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:05 IST

Bhandara : पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यविधी करताना गावकऱ्यांना करावा लागतो नानाविध संकटांचा सामना

अमोल ठवकरलोकमत न्यूज नेटवर्कपहेला : स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षांचा कालावधी लोटला तरी गावात शासनाच्या योजनांचा उपयोग होताना दिसत नाही. जवळच असलेल्या गोलेवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला डोंगरगाव येथील लोकसंख्या २५० च्या जवळपास आहे. या गावाला स्वतःची स्मशानभूमी नाही. त्यापैकीच एक गाव म्हणजेच डोंगरगाव. इथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला जागा शोधावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यविधी करताना नानाविध संकटांना समोर जावे लागत आहे.

इथे कविवर्य सुरेश भट्ट यांची कविता आठवतेय.. 'इतकेच मला सरणावर जाताना कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' डोंगरगाव हे गाव राज्यमार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. परंतु अद्याप स्मशानभूमीची जागा नाही. गोलेवाडी ग्रामपंचायतीतर्फे नियोजित सरकारी जागा गट क्रमांक सातची जागा नियोजित केली. परंतु या जागेकडे जाण्यासाठी मार्गच नाही.

आजूबाजूला शेतकऱ्यांचे शेत आहे. त्यामुळे डोंगरगाव नागरिक जिथे जमेल तिथे नाल्याच्या ठिकाणी अंत्यसंस्काराची विधी पार पाडतात. मागील दहा वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार हे डोंगरगाव आणि गोलेवाडी शिवारातील नाल्यावरच होत होते. परंतु याला गोलीवाडीतील नागरिकांनी विरोध दाखविला. शासनाकडे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाठपुरावा केला. मरणानंतरचा मार्ग खडतर असल्याचे गावकरी बोलून दाखवतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठेच अंत्यसंस्कारासाठी शेड नाही, पाणी नाही.

अंत्यविधीसाठी पाऊस उघडेपर्यंत वाट बघावी लागते. नाल्याच्या ठिकाणी जावे म्हटले तर एक किलोमीटरचे अंतर गाठावे लागते. त्या ठिकाणचा नाला हा उसळणी भरून वाहत असतो. डोंगरगाव गावालगत हक्काची जागा नसल्याने शासनाच्या दुर्लक्षितपणाचा कळसच म्हणावा लागेल. शासनाने या गावाला हक्काची स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून सोयी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी आहे.

"ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून तिथे येण्या-जाण्याचा मार्ग उपलब्ध करावा. तोपर्यंत किमान नाल्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सुविधा पुरवावी."- गुरुदेव चामट, माजी उपसरपंच, डोंगरगाव

टॅग्स :bhandara-acभंडारा