शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना केवळ पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

मुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी रेलचेल असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत. याचा उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे. प्रवाशांना मात्र तिकीटाचा भुर्दंड बसतो.

ठळक मुद्देआरक्षणाची सक्‍ती नकोच : भंडारा रेल्वे स्थानकातून धावते फक्त एक लोकल गाडी

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना महामारीमुळे रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा धावायला लागली आहेत. मात्र, आरक्षण करून रेल्वेच्या प्रवास करावा लागत आहे. परिणामी लोकल गाड्या कमीच असल्याने फक्त कोरोना पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सध्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस, समता एक्स्प्रेस गाड्यांचे आवागमन होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे भंडारा रोड रेल्वे स्थानकातून फक्त एक सर्वसाधारण लोकल गाडी धावत आहे. 

मग पॅसेंजर बंद कामुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी रेलचेल असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत. याचा उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे. प्रवाशांना मात्र तिकीटाचा भुर्दंड बसतो.

सध्या एकही स्पेशल ट्रेन सुरू नाही- भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्या धावत असून लांबपल्ल्याच्या स्पेशल ट्रेन येथे थांबत नाहीत. या रेल्वे स्थानकातून ३४ रेल्वे गाड्या धावत असतात. पॅसेंजर नसल्याचे अडचण होते.

एक्सस्प्रेसचा प्रवास परवडत नाही

रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. सर्वसाधारण प्रवाशांना लोकल भाडे आकारायला हवे. मात्र, विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट घेतली जात आहे. याचा आम्हाला फटका बसत आहे.-संतोष वाघमारे, प्रवासी

लोकल गाडीने प्रवास करता येते मात्र तिकीट दुपटीपेक्षा जास्त आहे. दररोज अप-डाऊन करणे शक्य बाब नाही. या मार्गावर पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढवायची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.-सुधाकर लांडे, प्रवासी.

प्रवाशांना बसतो भुर्दंड

- विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू आहे. परिणामी हा आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची धास्ती न बाळगता प्रवाशांचे हित ही लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या