शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:24 IST

आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज दाखल करताना एक ते दीड तास लागतात. एकीकडे खºया शेतकºयांना कर्ज माफी देऊ असे बोलत असले तरी ....

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : भाजप सरकारवर घेतले तोंडसुख, भंडाºयात पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज दाखल करताना एक ते दीड तास लागतात. एकीकडे खºया शेतकºयांना कर्ज माफी देऊ असे बोलत असले तरी दुसरीकडे बोगस शेतकरी समोर येतील अशी टिंगल उडवून शेतकºयांच्या वेदनांवर मीठ चोळण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. दुष्काळ असतानाही बळीराजाची ही पिळवणूक कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा कळकळीचा इशाराही आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला.भंडारा येथे शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आॅनलाईन कर्जमाफीची मुदत वाढविली असली तरी अनेक तांत्रीक कारणांमुळे अर्ज सबमिट व्हायला वेळ लागत आहे. कर्जमाफी द्यायची भाजप सरकारची नियत नाही. ना. चंद्रकांत पाटील यांनी, राज्यात दहा लक्ष शेतकरी बोगस असल्याचे सांगून शेतकºयांची थट्टा केली आहे. बोगस शेतकरी असतील तर त्यांची खुशालपणे यादी जाहिर करावी, आम्ही त्याची सहानिशा करु. परंतु असे बोलून सरकारच्या नियतीसोबतच शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळू नये असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.विकासान्भिमूख अनेक कामे रखडली असल्याचे सांगून वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यातील महत्वपूर्ण रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. दुसरीकडे भारनियमनाचा बडगा जनसामान्यांसह लघु उद्योगांचे कंबरडे मोडत आहे. अपुरा पाऊस असतांना व कोळशाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसताना सरप्लस वीज देण्याची घोषणा कोणत्या आधारावर करण्यात आली, हाही एक संशोधनाचा विषय आहे. वीज बिल भरमसाठ पाठवित असताना व कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित होत असताना ऊर्जा मंत्र्यांच्या क्षेत्रात ज्या प्रमाणे २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. तसाच पुरवठा येथील शेतकºयांच्या कृषी पंपानाही मिळाला पाहिजे.नागपूरातील नाग नदीच्या दुषीत पाण्यामुळे वैनगंगेचे पवित्र पाणी फार दुषीत झाले आहे. कोट्यवधींची घोषणा करणाºया मंत्र्यांनी नाग नदीच्या स्वच्छतेबाबत व जलशुध्दीकरणाबाबत का बोलत नाही असा टोलाही आमदार वडेट्टीवार यांनी लगावला.भाजपचेच खासदार सत्तेत असताना विरोधी सुर काढीत आहे. घरात असताना राजकारणात कबड्डी, खो-खो व लंगडी खेळ सुरु आहे काय? याचे उत्तर येणाºया काळात पहायला मिळणार आहे. काँग्रेस पक्षात येणाºया प्रत्येकाचेच आम्ही नेहमी स्वागत केले आहे. हीच काँग्रेसची परंपरा व संस्कृती आहे. खा. नाना पटोले काँग्रेसमध्ये यायला इच्छूक असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असेही बोलायला वडेट्टीवार विसरले नाही.यावेळी पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रदेश सचिव मुजीब पठाण, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, डॉ. अजय तुमसरे, सिमा भुरे, जि.प. सदस्य प्रेम वनवे, निलकंठ कायते, प्यारेलाल वाघमारे, महेंद्र निंबार्ते, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.