शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:24 IST

आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज दाखल करताना एक ते दीड तास लागतात. एकीकडे खºया शेतकºयांना कर्ज माफी देऊ असे बोलत असले तरी ....

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : भाजप सरकारवर घेतले तोंडसुख, भंडाºयात पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज दाखल करताना एक ते दीड तास लागतात. एकीकडे खºया शेतकºयांना कर्ज माफी देऊ असे बोलत असले तरी दुसरीकडे बोगस शेतकरी समोर येतील अशी टिंगल उडवून शेतकºयांच्या वेदनांवर मीठ चोळण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. दुष्काळ असतानाही बळीराजाची ही पिळवणूक कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा कळकळीचा इशाराही आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला.भंडारा येथे शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आॅनलाईन कर्जमाफीची मुदत वाढविली असली तरी अनेक तांत्रीक कारणांमुळे अर्ज सबमिट व्हायला वेळ लागत आहे. कर्जमाफी द्यायची भाजप सरकारची नियत नाही. ना. चंद्रकांत पाटील यांनी, राज्यात दहा लक्ष शेतकरी बोगस असल्याचे सांगून शेतकºयांची थट्टा केली आहे. बोगस शेतकरी असतील तर त्यांची खुशालपणे यादी जाहिर करावी, आम्ही त्याची सहानिशा करु. परंतु असे बोलून सरकारच्या नियतीसोबतच शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळू नये असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.विकासान्भिमूख अनेक कामे रखडली असल्याचे सांगून वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यातील महत्वपूर्ण रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. दुसरीकडे भारनियमनाचा बडगा जनसामान्यांसह लघु उद्योगांचे कंबरडे मोडत आहे. अपुरा पाऊस असतांना व कोळशाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसताना सरप्लस वीज देण्याची घोषणा कोणत्या आधारावर करण्यात आली, हाही एक संशोधनाचा विषय आहे. वीज बिल भरमसाठ पाठवित असताना व कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित होत असताना ऊर्जा मंत्र्यांच्या क्षेत्रात ज्या प्रमाणे २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. तसाच पुरवठा येथील शेतकºयांच्या कृषी पंपानाही मिळाला पाहिजे.नागपूरातील नाग नदीच्या दुषीत पाण्यामुळे वैनगंगेचे पवित्र पाणी फार दुषीत झाले आहे. कोट्यवधींची घोषणा करणाºया मंत्र्यांनी नाग नदीच्या स्वच्छतेबाबत व जलशुध्दीकरणाबाबत का बोलत नाही असा टोलाही आमदार वडेट्टीवार यांनी लगावला.भाजपचेच खासदार सत्तेत असताना विरोधी सुर काढीत आहे. घरात असताना राजकारणात कबड्डी, खो-खो व लंगडी खेळ सुरु आहे काय? याचे उत्तर येणाºया काळात पहायला मिळणार आहे. काँग्रेस पक्षात येणाºया प्रत्येकाचेच आम्ही नेहमी स्वागत केले आहे. हीच काँग्रेसची परंपरा व संस्कृती आहे. खा. नाना पटोले काँग्रेसमध्ये यायला इच्छूक असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असेही बोलायला वडेट्टीवार विसरले नाही.यावेळी पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रदेश सचिव मुजीब पठाण, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, डॉ. अजय तुमसरे, सिमा भुरे, जि.प. सदस्य प्रेम वनवे, निलकंठ कायते, प्यारेलाल वाघमारे, महेंद्र निंबार्ते, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.