शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वधू मिळेना; भंडारा जिल्ह्यातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 11:45 IST

ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे.

ठळक मुद्देव्यथा शेतकरी कुटुंबांची शासकीय नोकरदारांनाच वधूपित्याची पहिली पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे. मुलाकडे शेती पाहिजे मात्र मुलगा शेतकरी नको आहे. त्यामुळे पालकवर्गाची मुलीसाठी, मुलांसाठी धावपळ सुरू आहे. परिणामत: पालकाकडून विनवणी केल्या जात आहे की, फक्त मुलगी द्या, लग्न आम्हीच करू हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत.पुरूषधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जळ असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाले नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिना महिना नातेवाईकाच्या घरी फिायचे मात्र आता परिस्थिती बदलली आहे.खर्च आम्हीच करू म्हणून मुलाचे पालक मुलीसाठी वनवन भटकत आहेत. निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रत्येक पित्याला वाटते की, आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी, अशी आशा असते सध्याला ग्रामीण भागातील मुलीच्या पित्याची नजर शहरी भागातील मुलाकडे वळली आहे. श्रीमंत असो की, गरीब असो शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीचे पिता नकार देत आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणात वाढ होत आहे.पवनी तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाह इच्छूक मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाचे लग्न लाखो रूपयाची उधळण करून मोठ्या थाटामाटात करीत होते. मात्र आता वाढत्या शेतीच्या कर्जामुळे अल्प खर्चातचच लग्न साध्या पद्धतीने केल्या जात आहे. मुलगी मिळणे कठीण झाल्यामुळे बऱ्याच मुलांनी हुंडा दिल्याचे समजत आहे. मुलगी दाखवून व लग्न जोडून देणाºयांना सुगीचे दिवस आले आहेत.

शेतकरी नवरा नको, पण शेती हवीचच्शेतकरी मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार नाहीत. सर्वात प्रथम सरकारी नौकरीवर असलेल्या मुलांना प्राधान्य दिल्या जात आहे. परंतू काही ठिकाणी सध्याला नौकरी सोबत शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येत आहेत. शेतकरी नवरा नको पण शेती हवीच, असा प्रश्न पुढे येत आहे.

मुलीच्या शोधात वाढतेय वयच्पालोरा परिसरातील अनेक तरूण युवक लग्न करण्याकरिता पुढे आले असता मुलगी मिळत नसल्यामुळे त्यांची वय ३५ ते ४० वर्ष झाली आहे. काही मुलांनी तर तुम्हाला पैसे पाहिजेत असतील आम्ही द्यायला तयार आहोत. लग्नाचा संपूर्ण खर्चही आम्हीच करू फक्त मुलगी द्या, असाही निर्णय घेतानी दिसत आहेत. ही परिस्थिती पालोरा परिसरातच नाही तर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न