शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विरलीत होतोय दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:09 IST

येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्याशी खेळ : अनेक आजार बळावले, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कविरली/बुज : येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान ग्रामप्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरु केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.ईटान येथील वैनगंगा नदीवरील वाढीव पाणीपुरवठा योजनेतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी गावात सुमारे ४५० नळ जोडण्या असून ५ सार्वजनिक नळकोंडाळे आहेत.सध्या स्थितीत गावकऱ्यांना पुरविण्यात येणारे पाणी एवढे गढूळ आहे की, ते पिणे तर दुरच पण त्या पाण्याने आंघोळ करणे, कपडे धुने ही कठीण आहे. या पाण्यामुळे गावात सर्दी, खोकल्यासारखे आजार बळावले असून अतिसारासारखे जलजन्य रोग पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान गावात साजन बोकडे (४०) व सपना बोकडे (३५) या दोघांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरु आहेत. यावर्षी जलशुध्दीकरण औषधीचे वाटप करण्याचा ग्रा.पं. विसर पडला.जलपुर्नभरणाकडेही कानाडोळावैनगंगेवरील वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापुर्वी विरलीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या विहिरीवर होती. सदर योजना सुरु झाल्यानंतर या पाणी साठवण विहीरकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. या पाणीसाठवण विहिरीनी सुमारे आठ वर्षे विरलीकरांची तहान भागविली. वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यानंतरही मागील वर्षीपर्यंत पावसाळ्याच्या दिवसात या पाणी साठवण योजनेच्या विहिरीतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे गढूळ पाण्याची समस्या उद्भवत नव्हती. परंतु सध्या या विहीरीमध्ये गाळ साचल्याने या विहिरीमधील जल पुनर्भरण प्रक्रिया बंद पडली. विहिरीमधील गाळ उपसणे शक्य न झाल्याने गावकºयांवर गढूळ पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्य