शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

विरलीत होतोय दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:09 IST

येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्याशी खेळ : अनेक आजार बळावले, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कविरली/बुज : येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान ग्रामप्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरु केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.ईटान येथील वैनगंगा नदीवरील वाढीव पाणीपुरवठा योजनेतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी गावात सुमारे ४५० नळ जोडण्या असून ५ सार्वजनिक नळकोंडाळे आहेत.सध्या स्थितीत गावकऱ्यांना पुरविण्यात येणारे पाणी एवढे गढूळ आहे की, ते पिणे तर दुरच पण त्या पाण्याने आंघोळ करणे, कपडे धुने ही कठीण आहे. या पाण्यामुळे गावात सर्दी, खोकल्यासारखे आजार बळावले असून अतिसारासारखे जलजन्य रोग पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान गावात साजन बोकडे (४०) व सपना बोकडे (३५) या दोघांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरु आहेत. यावर्षी जलशुध्दीकरण औषधीचे वाटप करण्याचा ग्रा.पं. विसर पडला.जलपुर्नभरणाकडेही कानाडोळावैनगंगेवरील वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापुर्वी विरलीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या विहिरीवर होती. सदर योजना सुरु झाल्यानंतर या पाणी साठवण विहीरकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. या पाणीसाठवण विहिरीनी सुमारे आठ वर्षे विरलीकरांची तहान भागविली. वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यानंतरही मागील वर्षीपर्यंत पावसाळ्याच्या दिवसात या पाणी साठवण योजनेच्या विहिरीतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे गढूळ पाण्याची समस्या उद्भवत नव्हती. परंतु सध्या या विहीरीमध्ये गाळ साचल्याने या विहिरीमधील जल पुनर्भरण प्रक्रिया बंद पडली. विहिरीमधील गाळ उपसणे शक्य न झाल्याने गावकºयांवर गढूळ पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्य