शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी बोलीच्या संवर्धनासाठी जिल्हा साहित्य संमेलन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:56 IST

मराठीतील प्रत्येक बोलीच्या संवर्धनासाठी व्यापक कार्यक्रम या मोठ्या साहित्य संमेलनाऐवजी जिल्हा सािहत्य संमेलनाला प्राधान्य घ्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाद जोशी : भंडारा येथे अनिल नितनवरे स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठीतील प्रत्येक बोलीच्या संवर्धनासाठी व्यापक कार्यक्रम या मोठ्या साहित्य संमेलनाऐवजी जिल्हा सािहत्य संमेलनाला प्राधान्य घ्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा, सार्वजनिक वाचनालय व भंडारा व युगसंवाद वाड:मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडाराच्या संयुक्त विद्यमाने इंद्रराज सभागृह येथे डॉ. अनिल नितनवरे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, विदर्भ साहित्य संघाचे शाखा समन्वयक प्रदीप दप्ते, कलाकार वसंत वाहोकर, विसासंघाचे कोषाध्यक्ष प्रदीप मुन्शी, प्रदीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, आजची मराठीतील मोठमोठी संमेलने कुणाच्या आश्रयाने चालतात हे सर्वांनाच माहिती आहे. मग अशा आश्रयदात्यांच्या दबावाखाली सारं कराव लागते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे स्वत:चा निधी असता तर यवतमाळचे साहित्य संमेलन आम्हाला सहजासहजी यशस्वी करता आले असते. अशा साहित्य संमेलनासाठी निधी असावा. तो मराठी प्राध्यापकांनी व मराठी मानसांनी उभारावा, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. धनंजय दलाल यांनी विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन भंडारा येथे घेण्याची घोषणा केली. प्रास्ताविक प्रमोदकुमार अणेराव यांनी आभार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी मानले.

टॅग्स :marathiमराठी