शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

पीक कर्ज वाटपात जिल्हा सहकारी बँकेची आघाडी

By admin | Updated: July 17, 2016 00:20 IST

जिल्हास्तरीय समितीने सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात पिक कर्ज वाटपासाठी भंडारा जिल्हा सहकारी बँकेला २७० कोटी रूपयाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

९२ टक्के पीक कर्ज वाटप : राष्ट्रीयीकृत बँकांची माघारभंडारा : जिल्हास्तरीय समितीने सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात पिक कर्ज वाटपासाठी भंडारा जिल्हा सहकारी बँकेला २७० कोटी रूपयाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेने ५,१७२ सभासदांपैकी ३,७२८ सभासदांना १५३७.८० लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. १४ जुलैअखेर ५७,१०५ शेतकरी सभासदांना २५० कोटी ६२ लाख रूपयांचे पीक कर्जवाटप केले असून आतापर्यंत जिल्हा बँकेने ९२ टक्के पीक कर्जवाटप केले आहे.राष्ट्रीयकृत बँका मिळून केवळ २२५ कोटीचे उद्दिष्टे दिले. मात्र जिल्हा बँकेला २७० कोटीचे उद्दिष्टये देण्यात आले आहे. त्याहीस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँक आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांचीच बँक म्हणून ओळखली जाते. जिल्हा बँकही शेतकऱ्यांचे हित जोपासत आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी बँकेकडून वारंवार सुचनाही देण्यात येतात. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या संस्थेतून तथा बँकेतून कर्ज उचल घेवून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले आहे. एकीकडे जिल्हा बँक स्वनिधीतून कर्जपुरवठा करीत असते तर दुसरीकडे मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी हुंड्यापैकी काही रक्कम बँकेत जमा झाली नाही. हुुंड्यावरील व्याजाची रक्कम शासनाकडून बँकेला मिळाली नाही. ही योजना शासनाची असूनदेखिल शासन व्याजाचा पैसा पुरवू शकत नाही. जिल्हा बँकेकडून शासनाचे धोरण कटाक्षाने राबविले जातात. याउलट राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या धोरणांना बगल देतात, तरीही प्रशासनाकडून जिल्हा बँकेला वेटीस धरण्याचा प्रयत्न करतात. या बँकेवर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज नसतानाही जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वनिधीतून कर्ज वाटप करत असते. पिक आणेवारी कमी आली तर शासन कर्ज वसूलीस स्थगिती देते. अशास्थितीत पिक कर्जाची वसुली पूर्णपणे होत नाही, त्यामुळे बँकेकडे पैसा येत नाही असे असताना ही जिल्हा प्रशासन दरवर्षी पिक कर्जाचा आकडा जिल्हा बँकेला वाढवून देण्यात येतो. इतर बँकांना मात्र पिक कर्जाचे उद्दिष्टे वाढवून दिले जात नाही. हा प्रकार असाच सुरू राहिला तर जिल्हा बँकेचे दिवाळे निघायला वेळ लागणार नाही. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी संचालकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)