शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात पोस्ट पेमेंट बँकेतून तीन कोटींचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळते घेत बदल स्विकारला. विविध योजनांमध्ये अमुलाग्रह बदल घडून आणले. त्यामुळे पोस्टाला आता पुन्हा सुवर्ण दिवस येऊ पाहत आहे.

ठळक मुद्देघरपोच सेवा : १४०० व्यक्तींनी घेतला लाभ, बँकातील गर्दी टाळण्यात यश

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटाच्या काळात बँकात होणारी गर्दी लक्षात घेता डाक विभागाने इंडियन पोस्ट पेमेंट बँक संकल्पना आणली. त्याचा लाभ लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला. मार्च महिन्यापासून आतापर्यंत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून तीन कोटी नऊ लाख रूपयांचे घरपोच वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील १४०६ व्यक्तींनी याचा लाभ घेतला.पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळते घेत बदल स्विकारला. विविध योजनांमध्ये अमुलाग्रह बदल घडून आणले. त्यामुळे पोस्टाला आता पुन्हा सुवर्ण दिवस येऊ पाहत आहे.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या एईपीएस (आधार अनेबल पेमेंट सिस्टिम) सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच रक्कम मिळते. या माध्यमातून ग्राहकाचे पोस्टात खाते नसतानाही बँक खात्यातून पैसे काढू शकतात. एईपीएस रोख पैसे काढणे, फंड ट्रान्सफर, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इंक्वायरी असे पाच प्रकारचे व्यवहार करता येतात. यासाठी योग्य ती खबरदारी घेत ग्राहकाचे आधारकार्ड लिंक असलेले बँक खाते, आधार नंबर, मोबाईल क्रमांक, फिंगर प्रमाणिकरण केले जाते. विनाशुल्क दहा हजार रक्कम काढता येते.जिल्ह्यात १३७ टपाल कार्यालय आहे. २०० हून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना पैसे मिळत आहे. परिणामी बँकातील गर्दीही कमी होत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात २३ मार्च ते ११ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात तीन कोटी नऊ लाख रूपये एईपीएस सिस्टीमच्या माध्यमातून आतापर्यंत वितरित केली आहे.कोरोना संकटाच्या काळात पोस्टाने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पोस्टमन कडून घरबसल्या पैसे मिळत असल्याने बँकात गर्दी कमी झाली. यामाध्यमातून अनेक जण घरबसल्या पैसे काढत आहेत. पोस्टाच्या विविध योजना आता अत्याधुनिक झाल्या असून त्याचाही लाभ मिळत आहे.-वैभव बुलकुंदे, शाखा प्रबंधक,भारतीय पोस्ट पेमेंट बँक, भंडारा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPost Officeपोस्ट ऑफिस