शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

आठ गावांना दूषित पाणी पुरवठा

By admin | Updated: March 2, 2016 01:23 IST

जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत मागील चार दिवसापासुन आठ गावांना दूषित पिवळसर काळपट पाणीपुरवठा केला जात आहे.

काळपट पिवळसर पाणी : शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंतीजवाहरनगर : जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत मागील चार दिवसापासुन आठ गावांना दूषित पिवळसर काळपट पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.शहापूर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे स्त्रोत कोरंभी येथील वैनगंगा नदीवर स्थित पंपगृहाद्वारे करण्यात येतो. हे अशुध्द पाणी बेला येथील जलशुध्दीकरण केंद्राद्वारे शुध्द कले जाते. याच ठिकाणाहुन बेला, भोजापूर, उमरी, फुलमोगरा, शहापूर, गोपीवाडा, ठाणा, परसोडी या आठ गावांना सुमारे १२०० नळ जोडणीधारकांना पाणी पुरवठा करण्यात येते. वैनगंगा नदी पात्रातील पाणी हे दिवसेंदिवस पिवळसर काळपट होत आहे. शुध्दीकरण केल्यास हे पाणी शुध्दच होत नाही. याच पाण्याखाली काळी भुकटी जमा होतो. पाण्यास दुरगंधी येणे सुरु झाले आहे. हे पाणी वापरल्यास आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडलेला आहे. उन्हाळ्याची चाहुल लागणे सुरु झाले आहे. खासगी सार्वजनिक विहिरी हातपंपाच्या पाण्याची पातळी खोलात गेलेली आहे. परिणामी पुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वैनगंगाच्या पाण्यात नाग नदीचे काळपट पाणी मिसळल्याने सर्व नदीचे पाणी दूषित होत आहे. याकडे वरिष्ठ पातळीवर जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या वारंवार भासविणाऱ्या प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)