शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

ई-पास देण्यात भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:01 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पास देण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पास देण्यात दुजाभाव केला जात असून तेथील अधिकारी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कारण नसताना सुद्धा काही तासांत परवानगी देत आहेत. तर एका रूग्णाने २३ जून रोजी अर्ज केला असता त्याला २५ जून रोजी दुपारी मंजुरी मिळाली. मात्र त्यांना २५ त्याच दिवशी परत येण्याची मुभा देण्यात आली.

ठळक मुद्देफोन करा-पास मिळवा : सेटींग असल्यास लगेच मिळते पास

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे जिल्हाबंदी असल्याने नागरिकांना अतिआवश्यक कामांकरिता परवानगी घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठी ई-पास घ्यावे लागत असून अधिकारी आपल्या जवळील व्यक्तींना ठोस कारण नसतानाही पास देत आहेत. तर सर्वसामान्यांना मात्र कित्येक दिवस ताटकळत रहावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पास देण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पास देण्यात दुजाभाव केला जात असून तेथील अधिकारी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कारण नसताना सुद्धा काही तासांत परवानगी देत आहेत. तर एका रूग्णाने २३ जून रोजी अर्ज केला असता त्याला २५ जून रोजी दुपारी मंजुरी मिळाली. मात्र त्यांना २५ त्याच दिवशी परत येण्याची मुभा देण्यात आली. मजेची बाब ही की तो रूग्ण सायंकाळी नागपूर येथे दवाखान्यात जाणार केव्हा आणि येणार केव्हा.बहुतेक प्रवाशांकडे सक्षम कारण नसताना त्यांना काही तासांत पास मंजूर होत असून याप्रकरणी चौकशी केल्यास पोर्टलवर सर्व दिसून येईल. तर कित्येकांना सक्षम कारण असून सुद्धा इतर कारण सांगून पास रद्द केली जाते अशीही नागरिकांची ओरड आहे.जिल्ह्यातून अनेक लोक नागपूर, पुणे, मुंबई, वर्धा, जळगाव इतर ठिकाणी लग्न समारंभाकरीता काही तासातच पास प्राप्त करून फिरून आले. विशेष म्हणजे, ई-पास मंजुरी देताना सक्षम अधिकारी बघत नसल्याची शंका वर्तविली जात आहे.कर्मचाऱ्यांच्या जवळील व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्या व्हॉॅट्सअ‍ॅपवर टोकन नबंर मॅसेज केले जाते ते पाहून लगेच ई-पास ला मंजुरी मिळते. यासाठी मोबाईल तपासले तर नक्कीच पितळ उघडे होईल असे नागरिक बोलत आहेत.जिल्ह्यात अर्ज भरपूर असतील पण अधिकाऱ्यांनी आप्त स्वकियांचा विचार केला तर इतर रूग्ण कोणाच्या भरवशावर जगणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणीजिल्ह्यात ये-जा करणाºया प्रवाशांचे अधिक अर्ज पेंडिंग आहेत. अशावेळी प्रथम गंभीर आजारी रुग्णांचे अर्ज तपासावे व अधिकारी वर्गाच्या संख्येत वाढ करावी. ते न जमल्यास नाक्यावर प्रवाशांकडे सक्षम पुरावे, मेडिकल फिटनेस व अर्ज केल्याच्या टोकनची प्रत असल्यावर जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या