शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष

By admin | Updated: September 9, 2016 01:27 IST

येथील महावितरण कार्यालयावर १५० शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत खंडीत विजेमुळे संताप व्यक्त होत आहे.

पाच कृषी फिडर बंद : खराशी पुलाच्या बांधकामाने कोसळला खांब, शेकडो शेतकरी अडचणीतपालांदूर : येथील महावितरण कार्यालयावर १५० शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत खंडीत विजेमुळे संताप व्यक्त होत आहे. मागील दहा दिवसांपासून खराशी पुलाच्या बांधकामामुळे खांब कोसळला. यामुळे परिसरातील कृषी फिडर पूर्णत: बंद झाल्याने सिंचन रखडले आहे. धानपीक गर्भावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज असताना निसर्गाने दगा दिला. महावितरणने पुढाकार न घेतल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. विद्युत खांब जमीनदोस्त होऊ शकतो, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते डमदेव कहालकर यांनी महावितरणला दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने खांब कोसळला. यात बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकारी एकमेकांना सावरत बाजू सांभाळत आहेत. यात मात्र शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. महावितरणची कामे कंत्राटी पद्धतीने होतात. यात मुख्य कंत्राटदार त्यांचे उपकंत्राट दुसऱ्यांना देतात. याकडे मुख्य कंत्राटदार पाहत नसल्याने कामाचा बोजवारा वाजतो. यासंदर्भात शेतकऱ्यंनी महावितरण विभागाला दिलेल्या निवेदनानुसार, आम्हाला अचुक बिल व नियमित द्या, आम्ही नक्की भरू. पण महावितरण आरएनएच्या नावाखाली अव्वाच्यासव्वा बिल पाठवून शेतकऱ्यांना वेठीस धरतात. शेतकऱ्यांचे बिल त्यांच्या घरी देत नसल्याचा आरोप कहालकर यांनी केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी आपुलकी नसल्याने खंडीत वीज वेळीच सुरळीत होत नाही. कारखान्यांना दिवसाला १२ तास वीज मिळते. मग शेतकऱ्यांना का नाही? असा सवालही शेतकऱ्यांनी केला. मुख्यमंत्री व उर्जामंत्र्यांनी दिवसाला १२ तास वीज देण्याचे मान्य केले. मात्र प्रत्यक्षात ७-८ तासाच्या वर वीज मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)खराशी नाल्यावरील वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद आहे. पूर्ववत करण्याकरिता कंत्राटदाराशी बोलणी सुरु आहे. माणसे मिळत नसल्याचे कारण कंत्राटदार सांगत आहे. काम सुरु केल्यास २-३ दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला जाईल. - पंकज आखाडे, सहाय्यक अभियंता, पालांदूर चौ.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्युत खांब पडला. घटना रात्रीला घडल्याने काही अनुचित घडले नाही. अन्यथा जीवीतहानी झाली असती. पुलाची उंची व खांबाची उंची हे अंतर कमी आहे. खांब पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्याला विद्युत व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. - तुकाराम भुसारी, शेतकरी, पालांदूर चौ.