शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महावितरणविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष

By admin | Updated: September 9, 2016 01:27 IST

येथील महावितरण कार्यालयावर १५० शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत खंडीत विजेमुळे संताप व्यक्त होत आहे.

पाच कृषी फिडर बंद : खराशी पुलाच्या बांधकामाने कोसळला खांब, शेकडो शेतकरी अडचणीतपालांदूर : येथील महावितरण कार्यालयावर १५० शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत खंडीत विजेमुळे संताप व्यक्त होत आहे. मागील दहा दिवसांपासून खराशी पुलाच्या बांधकामामुळे खांब कोसळला. यामुळे परिसरातील कृषी फिडर पूर्णत: बंद झाल्याने सिंचन रखडले आहे. धानपीक गर्भावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज असताना निसर्गाने दगा दिला. महावितरणने पुढाकार न घेतल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. विद्युत खांब जमीनदोस्त होऊ शकतो, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते डमदेव कहालकर यांनी महावितरणला दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने खांब कोसळला. यात बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकारी एकमेकांना सावरत बाजू सांभाळत आहेत. यात मात्र शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. महावितरणची कामे कंत्राटी पद्धतीने होतात. यात मुख्य कंत्राटदार त्यांचे उपकंत्राट दुसऱ्यांना देतात. याकडे मुख्य कंत्राटदार पाहत नसल्याने कामाचा बोजवारा वाजतो. यासंदर्भात शेतकऱ्यंनी महावितरण विभागाला दिलेल्या निवेदनानुसार, आम्हाला अचुक बिल व नियमित द्या, आम्ही नक्की भरू. पण महावितरण आरएनएच्या नावाखाली अव्वाच्यासव्वा बिल पाठवून शेतकऱ्यांना वेठीस धरतात. शेतकऱ्यांचे बिल त्यांच्या घरी देत नसल्याचा आरोप कहालकर यांनी केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी आपुलकी नसल्याने खंडीत वीज वेळीच सुरळीत होत नाही. कारखान्यांना दिवसाला १२ तास वीज मिळते. मग शेतकऱ्यांना का नाही? असा सवालही शेतकऱ्यांनी केला. मुख्यमंत्री व उर्जामंत्र्यांनी दिवसाला १२ तास वीज देण्याचे मान्य केले. मात्र प्रत्यक्षात ७-८ तासाच्या वर वीज मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)खराशी नाल्यावरील वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद आहे. पूर्ववत करण्याकरिता कंत्राटदाराशी बोलणी सुरु आहे. माणसे मिळत नसल्याचे कारण कंत्राटदार सांगत आहे. काम सुरु केल्यास २-३ दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला जाईल. - पंकज आखाडे, सहाय्यक अभियंता, पालांदूर चौ.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्युत खांब पडला. घटना रात्रीला घडल्याने काही अनुचित घडले नाही. अन्यथा जीवीतहानी झाली असती. पुलाची उंची व खांबाची उंची हे अंतर कमी आहे. खांब पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्याला विद्युत व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. - तुकाराम भुसारी, शेतकरी, पालांदूर चौ.