शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सोंड्याटोला प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत

By admin | Updated: November 26, 2015 00:33 IST

महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या दीड महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत आहे. या प्रकल्पस्थळात सुरक्षा गार्ड अंधारात निगराणी ठेवत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.

पाण्याचा उपसा बंद : उन्हाळी धानाचे पीक वांद्यात, लोकप्रतिनिधींवर रोषचुल्हाड : महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या दीड महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत आहे. या प्रकल्पस्थळात सुरक्षा गार्ड अंधारात निगराणी ठेवत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.वीज वितरण कंपनीचे खरीप हंगामातील ३४ लाखांचे विजेचे देयके थकल्याने प्रकल्प स्थळात गेल्या महिन्यात सात तारखेला वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. प्रकल्पस्थळात या कालावधीत पाण्याचा उपसा थांबल्याने पुढील वर्षात घेण्यात येणारे उन्हाळी धानाचे पीक अडचणीत आले आहे. लोकप्रतिनिधी तथा सरकारच्या निष्क्रिय धोरणाचा फटका सिहोरा परिसरातील शेतीला बसणार आहे. ऐन खरीप हंगामात बावनथडी नदी पात्रात पाणी दुथडी भरून वाहत असताना पंपगृह विलंबाने सुरु करण्यात आला होता. यामुळे चांदपूर जलाशयाला ओव्हरफ्लो करता आले नाही. यामुळे जलाशयात अंतीम क्षणापर्यंत २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली होती. या पाण्यामुळे सिहोरा परिसरात १२ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यात यश आले. प्रकल्पस्थळात ९ पंपगृह असताना अखेरपर्यंत २ पंपगृह नादुरुस्त ठेवण्यात आले आहे. यामुळे अतिरिक्त पाण्याचा उपसा करण्यात आलेला नाही. प्रकल्पस्थळात सुरुवातीपासून ठिकठाक नसल्याची माहिती अस्थायी कामगारांनी दिली होती. परंतु लोकप्रतिनिधी तथा यंत्रणेमार्फत गांभीर्याने घेण्यात आले नाही. नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निधी नसल्याची बोंबाबोंब करीत होती. पंपगृह पाण्याचा उपसा करीत असताना शासन स्तरावर निधीची जुळवाजुळव करण्यात आली नाही. महिनाभर पंपगृहाने पाण्याचा उपसा केल्यानंतर विजेचे देयक थकविल्याचे कारणावरून वीज पुरवठा खंडीत करण्यात कारवाई करण्यात आली आहे. यामुळे १५ दिवस निरंतर उपसा करण्यात येणारा इतका पाणी नदीपात्रात वाहून गेला आहे. यामुळे या संकटात पाण्याची साठवणूक करता आली नाही. वीज पुरवठा सुरु करण्यासाठी उपविभागीय अभियंता पी.एन. लांजेवार यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत तडजोडीतून मार्ग काढण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला आहे. पाच टप्प्यात विजेचे देयके जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु हे प्रयत्न फिस्कटल्याची बाब निदर्शनास आली आहे. २० दिवस आधी करण्यात आलेले या चर्चेचे फलीत प्रकल्प स्थळात दिसून आले नाही. (वार्ताहर)