शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

ओबीसींच्या भूमिकेने उमेदवारांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. बहुसंख्य असलेल्या या घटकाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर काय? असा प्रश्न आता या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी नामाप्र प्रवर्गातून १०७, तर पंचायत समितीसाठी २६४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ही निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे आता ३९ जागांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष आणि १६३ स्त्रियांचा समावेश आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांचा मागासप्रवर्गातील जागांवर निवडणुकीला स्थगिती देताच ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. निवडणुकीवर बहिष्काराची घाेषणा हाेऊ लागली. या घाेषणेमुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच ही निवडणूक हाेणार की संपूर्ण निवडणुकीला स्थगिती मिळणार याबाबतही संभ्रम कायम आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. विविध पक्षांसह इच्छुकांनी नामांकन दाखल केले. मात्र, नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर राेजी सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्य निवडणूक आयाेगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या  २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. तसेच तीन नगर पंचायतींच्या १२ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. आरक्षणच नाही तर मतदान नाही, अशी थेट भूमिका घेतली.भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. बहुसंख्य असलेल्या या घटकाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर काय? असा प्रश्न आता या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी नामाप्र प्रवर्गातून १०७, तर पंचायत समितीसाठी २६४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ही निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे आता ३९ जागांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष आणि १६३ स्त्रियांचा समावेश आहे. तसेच पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास ९०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, या सर्वांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून अस्वस्थता पसरली आहे.आता निवडणूक हाेणार की रद्द हाेणार हाही संभ्रम उमेदवारात आहे. निवडणूक झाली आणि ओबीसी समाजातील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर या निवडणूकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यातच निवडणूक झाली तरीही सत्ता स्थापन हाेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण हाेवू शकते. त्यामुळे या उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे.

निवडणुकीतील रंगत संपली- ऐन भरात आलेल्या निवडणुकीची रंगत नागरिकांच्या मागासप्रवर्गातील जागांवरील निवडणूक स्थगित झाल्याने संपली आहे. निवडणुकी रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. निवडणूक रद्द झाली तर काय? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ६ डिसेंबरपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले हाेते. मात्र, आता केवळ निवडणूक स्थगित झाल्याच्या चर्चा दिसत आहेत. एकप्रकारे या निवडणुकीत सर्वांचा उत्साह गेल्याचे दिसत आहे.

१३ डिसेंबर राेजी   हाेणार चित्र स्पष्ट- ३९ गट व ७९ गणांसाठी निवडणूक हाेत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तिथी १३ डिसेंबर आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट हाेईल. त्यानंतरच चिन्ह वाटप हाेईल व प्रचाराला सुरुवात हाेईल. मात्र, प्रचारादरम्यान ओबीसीचा मुद्दा मात्र कायम राहील.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदOBC Reservationओबीसी आरक्षण