शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर येथे पावसाळ्यातील बागायत शेतीचे शिस्तबद्ध पूर्वनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST

पालांदूर : चुलबंद खोऱ्यासह अख्ख्या लाखनी तालुक्यात बागायत शेतीचे क्षेत्रफळ दररोज वाढत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन समस्या उभी राहिल्याने उन्हाळी ...

पालांदूर : चुलबंद खोऱ्यासह अख्ख्या लाखनी तालुक्यात बागायत शेतीचे क्षेत्रफळ दररोज वाढत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन समस्या उभी राहिल्याने उन्हाळी हंगामात बागायतदारांना नुकसान सहन करावे लागले. ही मरगळ झटकून पुन्हा पावसाळी बागायतीचे पूर्वनियोजन सुरू झालेले आहे.

पालांदूर येथील शेतकरी रूपेश भुसारी यांच्यासह अनेक शेतकरी पावसाळी बागायतीत व्यस्त आहेत.

दिवसेंदिवस शेतकरीसुद्धा शेतीत बदल घडवत आहे. तांत्रिक जमान्याचा आधार घेत हौशी शेतकरी शेतीत नवे तंत्र उपयोगात आणत शेती कसत आहे. चुलबंद खोरे सुजलाम् सुफलाम् आहे. कृषी विभागाचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषी तंत्रज्ञान, कृषी मित्र शेतकऱ्यांच्या सोबत आहेत. मल्चिंग पेपरचा आधार घेत जमिनीला नैसर्गिक उतार देत बागायतीचे क्षेत्र नवे रूप स्वीकारत आहे. स्पर्धेच्या युगात भाजीपाल्याचा दर्जा सुधारण्याकरिता नवे तंत्र उपयोगात येत आहे. वर्षाच्या ३६५ दिवसही हिरवा भाजीपाला चुलबंद खोऱ्यात उत्पादित होत आहे. स्वतः शेतकरी चारचाकी वाहन घेत मोठ्या भाजी मंडीत स्वतः भाजी विकत आहे. सब्जी मंडीत गेलेल्या मालाला कशी किंमत मिळते याचा प्रत्यक्ष अनुभव बागायतदार घेत आहे.

वर्तमानात चुलबंद खोऱ्यात उन्हाळी भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणात आहे. टोमॅटोसारखे पीक अधिक उष्णतेत पिकवले जात आहे. कारले, भेंडी, वांगी, पालेभाज्या, कोहळा, टरबूज, फणस यासारख्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळत आहेत. यामुळे बागातदाराच्या हातात पैसा खेळत आहे.

चौकट

स्पर्धा वाढल्याने उत्पादित मालाचा दर्जा वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. बीटीबी सारख्या मोठ्या भाजी मंडीत दर्जेदार भाजीपाला अत्यावश्यक आहे. मल्चिंग पेपरचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून निंदनाचा त्रास कमी होतो. मजूर संख्या कमी लागते. पर्यायाने दोन पैसे बचतीकरिता सोयीचे होते. बरेच शेतकरी धानाची शेती कमी करून बागायतीकडे वळलेले आहेत. सपाट जमिनीला उंचवटा देऊन नैसर्गिक उतार तयार करीत बागायतीचे क्षेत्र दररोज वाढत आहे. पालांदूर, मऱ्हेगाव, वाकल, पाथरी, खराशी, खुनारी, नरव्ह, लोहारा, जेवणाळा, मचारना, इसापूर, गुरडा, गोंडेगाव, कनेरी, आदी गावांत पावसाळ्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत आहे.

संपूर्ण तालुक्यात चुलबंद खोऱ्यासह भाजीपाल्याचे पावसाळ्यातील क्षेत्र प्रगतीवर आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात भाजीपाल्याचे सुमार उत्पादन वाढलेले आहे.

बीटीबी सब्जी मंडी शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरलेली आहे. सेंद्रिय शेतीकडे अधिक लक्ष देत रासायनिक शेती कमी होत आहे. पर्यायाने खर्चातसुद्धा बचत होत आहे.

पद्माकर गीदमारे, तालुका कृषी अधिकारी लाखनी

जिल्ह्यातला पैसा जिल्ह्यातच थांबावा याकरिता प्रयत्न फळाला आलेले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी हुशार व मेहनती होत आहे. बाहेर जिल्ह्यातून भाजीपाला आवकपेक्षा निर्यात अधिक होत आहे. याकरिता कृषी विभागाचे सहकार्य मिळत आहे.

बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी, भंडारा