शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

शासनाकडून अपेक्षाभंग

By admin | Updated: May 11, 2015 00:19 IST

मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली.

प्रफुल पटेल : मोर्चातून करणार निषेधभंडारा : मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली. अन्न, वस्त्र, निवारा यासह बेरोजगारीमध्येही प्रचंड तुट निर्माण झाली. म्हणून शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या अपेक्षा संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येईल. या आशयाची माहिती माजी केंद्रीय उद्योगमंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी आज सायंकाळी ५.३० वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जयंत वैरागडे आदी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले धान उत्पादक शेतकरी धानाला भाव नसल्याने प्रचंड खचला आहे. संपुआ सरकारने बोनस देवून शेतकऱ्यांना आधार दिला होता. मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडची पाने पुसण्यात आली. ऊसाचे चुकारेही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. वाढती महागाई, मजुरी यामुळे शेतकरी पूरता खचला आहे. खतांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन मिळालेले नाही. केरोसिनच्या कोटयात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करुन जनसामान्यांना सोडले आहे. तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला प्रकल्पाचे विद्युत बिल न भरल्यामुळे ४२ गावांना या हंगामात सिंचन करता आले नाही. भारनियमनाची समस्याही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. यासह अन्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असेही खा. पटेल यांनी सांगितले. या मोर्च्यात शेतकऱ्यांसह सर्वांनीच सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)