शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

शासनाकडून अपेक्षाभंग

By admin | Updated: May 11, 2015 00:19 IST

मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली.

प्रफुल पटेल : मोर्चातून करणार निषेधभंडारा : मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली. अन्न, वस्त्र, निवारा यासह बेरोजगारीमध्येही प्रचंड तुट निर्माण झाली. म्हणून शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या अपेक्षा संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येईल. या आशयाची माहिती माजी केंद्रीय उद्योगमंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी आज सायंकाळी ५.३० वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जयंत वैरागडे आदी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले धान उत्पादक शेतकरी धानाला भाव नसल्याने प्रचंड खचला आहे. संपुआ सरकारने बोनस देवून शेतकऱ्यांना आधार दिला होता. मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडची पाने पुसण्यात आली. ऊसाचे चुकारेही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. वाढती महागाई, मजुरी यामुळे शेतकरी पूरता खचला आहे. खतांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन मिळालेले नाही. केरोसिनच्या कोटयात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करुन जनसामान्यांना सोडले आहे. तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला प्रकल्पाचे विद्युत बिल न भरल्यामुळे ४२ गावांना या हंगामात सिंचन करता आले नाही. भारनियमनाची समस्याही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. यासह अन्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असेही खा. पटेल यांनी सांगितले. या मोर्च्यात शेतकऱ्यांसह सर्वांनीच सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)