शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून अपेक्षाभंग

By admin | Updated: May 11, 2015 00:19 IST

मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली.

प्रफुल पटेल : मोर्चातून करणार निषेधभंडारा : मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली. अन्न, वस्त्र, निवारा यासह बेरोजगारीमध्येही प्रचंड तुट निर्माण झाली. म्हणून शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या अपेक्षा संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येईल. या आशयाची माहिती माजी केंद्रीय उद्योगमंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी आज सायंकाळी ५.३० वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जयंत वैरागडे आदी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले धान उत्पादक शेतकरी धानाला भाव नसल्याने प्रचंड खचला आहे. संपुआ सरकारने बोनस देवून शेतकऱ्यांना आधार दिला होता. मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडची पाने पुसण्यात आली. ऊसाचे चुकारेही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. वाढती महागाई, मजुरी यामुळे शेतकरी पूरता खचला आहे. खतांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन मिळालेले नाही. केरोसिनच्या कोटयात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करुन जनसामान्यांना सोडले आहे. तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला प्रकल्पाचे विद्युत बिल न भरल्यामुळे ४२ गावांना या हंगामात सिंचन करता आले नाही. भारनियमनाची समस्याही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. यासह अन्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असेही खा. पटेल यांनी सांगितले. या मोर्च्यात शेतकऱ्यांसह सर्वांनीच सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)