शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांनी अधिकार मिळविण्यासाठी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:43 IST

देशात अतापर्यंत जे समाज सत्तेपासून, अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता हातात घ्यावी व आपले अधिकार मिळवावे, यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : भंडारा येथे भारिप बहुजन महासंघाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :देशात अतापर्यंत जे समाज सत्तेपासून, अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता हातात घ्यावी व आपले अधिकार मिळवावे, यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील इंद्रलोक सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन समाजाच्या पुढारींसोबत आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते.यावेळी सभेला माजी आमदार मोरे, आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, भारिप बहुजन महासंघ प्रदेश महासचिव सागर डबरासे, हलबा समाजाचे नेते खुशाल निमजे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे, सुरेश मते, एल.के. मडावी, शांताराम निनावे, मंगलमूर्ती सोनकुसरे, संजय हेडाऊ, जिल्हा महिला अध्यक्ष वृंदा उके यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी लोक देशातील मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्याकरिता देशात दंगे घडवून आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्याचाच ऐक भाग म्हणून दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रतीचे पन्ने जाळण्यात आले. पण आम्ही त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला. संचालन माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे तर प्रास्ताविक भाषण भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रंजीत कोल्हटकर यांनी केले. आभार विद्यार्थी नेत्या सानिया डोंगरे यांनी मानले.