शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

धानाला बाेनस नाकारला, आता ‘डीबीटी’ कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

आधारभूत खरेदी याेजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात ३८ लाख सहा हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आपला धान विकला. हमीभावानुसार शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १९४० रुपये दिले जात आहे. २०१५-१६ पासून शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून बाेनस दिला जाताे. गतवर्षी ७०० रुपये बाेनस देण्यात आला हाेता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना बाेनस मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु आता राज्य शासनाने बाेनस नाकारला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य सरकारने बाेनस नाकारून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली असून, बाेनसऐवजी आता डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अंतर्गत निधी देण्याची तयारी चालविली आहे. मात्र अद्यापही डीबीटीच्या माध्यमातून नेमकी किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार याबाबत स्पष्ट नाही. बाेनसच्या धर्तीवर डीबीटी रक्कम द्यावयाची झाल्यास एकट्या भंडारा जिल्ह्यासाठी २७५ काेटी रुपयांची आवश्यकता आहे.आधारभूत खरेदी याेजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात ३८ लाख सहा हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आपला धान विकला. हमीभावानुसार शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १९४० रुपये दिले जात आहे. २०१५-१६ पासून शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून बाेनस दिला जाताे. गतवर्षी ७०० रुपये बाेनस देण्यात आला हाेता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना बाेनस मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु आता राज्य शासनाने बाेनस नाकारला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. पूर्व विदर्भात ठिकठिकाणी बाेनससाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहे. भंडारा येथे ही भाजप किसान आघाडीच्या वतीने आंदाेलन करण्यात आले.बाेनसऐवजी शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत लाभ देण्याच्या हालचाली आहेत. मात्र नेमका किती निधी शेतकऱ्यांना मिळणार हे मात्र अद्याप ठरले नाही. परंतु गतवर्षी दिलेल्या बाेनसप्रमाणे ७०० रुपये प्रति क्विंटल डीबीटी केल्यास भंडारा जिल्ह्यासाठी जवळपास २७५ काेटी रुपयांची आवश्यकता आहे. परंतु याबाबत अद्याप शासनाच्या वतीने काेणतेही नियाेजन दिसत नाही.

धान शेती नेणार कर्जाच्या खाईत...- निसर्गाची अवकृपा आणि महागाई यामुळे उत्पादन आणि लागवड खर्च याचा ताळमेळ लागत नाही. बियाणे, खत, औषधी, मजुरी आदींच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. मात्र शासन हमीभावानुसार १९४० रुपये दर देत आहे. हा दर शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत नेणारा आहे. बाेनसमुळे शेतकऱ्यांना कसातरी आधार मिळत हाेता. परंतु आता बाेनस नाकारून शासनाने शेतकऱ्यांना देशाेधडीला लावण्याचा प्रयत्न चालविल्याचा आराेप हाेत आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाेनस देण्यास नकार दिला आहे. डीबीटी देण्याची भाषा केली जात आहे. परंतु डीबीटीबाबत काेणतेही धाेरण अद्याप ठरलेले नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासह डीबीटीची रक्कम तत्काळ द्यावी अन्यथा आम्ही आंदाेलन करू.- शिशुपाल पटले, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप किसान माेर्चा

 

टॅग्स :Farmerशेतकरी