शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

धम्म पंचशिलाचे पालन करणे गरजेचे

By admin | Updated: February 8, 2015 23:30 IST

जवाहरनगर : धम्म म्हणजे काय, जसा समजून घेतला तसा दुसऱ्यांनाही समजाविला पाहिजे. नकारात्मक विचार दूर सारून पंचशील तत्वाचे पालन सर्व समाज बांधवांनी करणे गरजेचे आहे,

हत्तीडोह येथे बौध्द धम्म मेळावाजवाहरनगर : धम्म म्हणजे काय, जसा समजून घेतला तसा दुसऱ्यांनाही समजाविला पाहिजे. नकारात्मक विचार दूर सारून पंचशील तत्वाचे पालन सर्व समाज बांधवांनी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदन्त संघरत्न यांनी केले. ऐतिहासिक दशबल पहाडी हत्तीडोई बौद्ध पर्यटन स्थळ येथे दशबल पहाडी भिक्षु संघ द्वारा माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त आयोजित बौद्ध धम्म मेळाव्याप्रसंगी भदंत संघरत्न बोलत होते. अध्यक्षस्थानी भदंत डॉ. धम्मदीप हे होते. यावेळी भदन्त धम्मपाल, भदंत संघप्रिय, भदंत धम्मज्योती, भदंत शिलानंद, भदंत शिलधन महास्तवीर, भिक्षु संघाचे अध्यक्ष विमल बोधी, वसंत हुमणे, अमृत बन्सोड, शशीकांत भोयर, महादेव मेश्राम, प्रियकला मेश्राम, रमेश जांगळे, मदनपाल गोस्वामी, राजू वाहने आदी उपस्थित होते. या बौद्ध पर्यटनस्थळाचे पावित्र्य टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. आपला संघर्ष कुणासोबत आहे हे जाणून समजून घेतले पाहिजे. जीवन हे क्रांतीकारी संघर्षाचे आहे. इतिहासाची जपणूक करून वर्तमानासाठी आदर्श निर्माण करावे, असे अमृत बन्सोड यांनी प्रतिपादन केले. डॉ. धम्मदिप म्हणाले, सर्वांनी शिक्षित झाले पाहिजे. जो आपल्यावर अन्याय व अत्याचार करतो त्यांच्याविरुद्ध संघटीत होऊन शांततेच्या मार्गाने न्यायपूर्व निर्णयासाठी संघर्ष करावे. तत्पूर्वी सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भिक्षु धम्मज्योती यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर त्रिरत्न बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी विविध गावाहून बौद्ध जनतेची बौद्ध पर्यटन स्थळी एकच गर्दी जमली होती. बौद्ध उपासक व उपासिकाद्वारे भिक्षु संघाला भोजनदान देण्यात आले. प्रास्ताविक भिक्षुणी संघप्रिया यांनी केले. संचालन भिक्षु धम्मज्योती यांनी केले. आभार मदनपाल गोस्वामी यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.(वार्ताहर)