शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'हे सामान्य माणसांचं नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 17:35 IST

सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

भंडारा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. हे सरकार सामान्य माणसाचं नसून दारू विकणाऱ्यांचे असल्याचा घाणाघात त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस सध्या भंडारा दौऱ्यावर असून, लाखनी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सभेत सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार सामान्य माणसांचं सरकार नाही, लोकांसाठी काम करणारं सरकार हरवल आहे. कोरोना काळात या सरकारने सामान्य नागरिकांना जराही मदत केली नाही. परंतु, बार मालक शरद पवारांकडे मदतीसाठी गेले तेव्हा त्यांनी परवाना शुल्क कमी केले. विदेशी दारुवर ५० टक्के कर माफ करण्याचा निर्णय घेतला. हे गरिबांचे नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला. 

ओबीसी आरक्षण रद्द करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. त्यांनी वेळीच इम्पिरिकल डेटा जमा केला असता तर आज ही वेळ आली नसती. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता असेही फडणवीस म्हणाले. 

यासोबत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरही निशाणा साधला, पटोले रोज संविधान खतरे में हैं म्हणतात, पण धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना मात्र ते बोलत नाही. आम्ही ५ वर्षाच्या काळात एकदाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र, हे सरकार रोज शेतकऱ्यांची वीज कापत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेElectionनिवडणूक