शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

'हे सामान्य माणसांचं नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 17:35 IST

सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

भंडारा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. हे सरकार सामान्य माणसाचं नसून दारू विकणाऱ्यांचे असल्याचा घाणाघात त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस सध्या भंडारा दौऱ्यावर असून, लाखनी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सभेत सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार सामान्य माणसांचं सरकार नाही, लोकांसाठी काम करणारं सरकार हरवल आहे. कोरोना काळात या सरकारने सामान्य नागरिकांना जराही मदत केली नाही. परंतु, बार मालक शरद पवारांकडे मदतीसाठी गेले तेव्हा त्यांनी परवाना शुल्क कमी केले. विदेशी दारुवर ५० टक्के कर माफ करण्याचा निर्णय घेतला. हे गरिबांचे नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला. 

ओबीसी आरक्षण रद्द करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. त्यांनी वेळीच इम्पिरिकल डेटा जमा केला असता तर आज ही वेळ आली नसती. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता असेही फडणवीस म्हणाले. 

यासोबत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरही निशाणा साधला, पटोले रोज संविधान खतरे में हैं म्हणतात, पण धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना मात्र ते बोलत नाही. आम्ही ५ वर्षाच्या काळात एकदाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र, हे सरकार रोज शेतकऱ्यांची वीज कापत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेElectionनिवडणूक