शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जिल्ह्यात निधीअभावी पर्यटन विकासाची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:56 IST

जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचे गाजर दाखवून पर्यटनविकासाच्या नावाखाली विकासाची वानवा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन भरभराटीला येण्यासाठी खुंटत चाललेली आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर हा उत्तम नमूना आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी उदासीन : रोजगार निर्मितीलाही अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचे गाजर दाखवून पर्यटनविकासाच्या नावाखाली विकासाची वानवा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन भरभराटीला येण्यासाठी खुंटत चाललेली आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर हा उत्तम नमूना आहे.नदी तलाव वनसंपदा, डोंगररांगा, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा जिल्ह्याला लाभला आहे. कोका, उमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्य, पांडे महाल, चांदपूर, रावणवाडी जलाशय, गोसीखुर्द अशा पर्यटनाला मोठा वाव आहे. परंतु अद्यापही मात्र पाहिजे त्या प्रमाणात सौंदर्यीकरण व दृष्टीकोनातून विकासाचा स्पर्श येथे झालेला नाही. लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळ विकासापासून कोसो दूर आहेत.जर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना चांगल्या प्रकारे विकसीत केले तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मात्र पर्यायाने रोजगार निर्मितीची संधी सुद्धा स्थानिकांसाठी दुरावली आहे.रोजच्या रोज बेरोजगारी वाढत आहे. जिल्ह्यात मोठ्या कंपन्यासुद्धा नाहीत. यामुळे येत्या दिवसात बेरोजगारी तीव्र रुप धारण करणार आहे. यासाठी पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. तीन हजार ७१६ वर्ग कि.मी. क्षेत्रात असलेल्या भंडारा जिल्ह्यात विपूल वनसंपदा आहे. कोका, उमरेड, पवनी करांडला अभयारण्य प्रकल्प आहेत. वॉर्डांच्या अधिवासासाठी भंडारा जिल्ह्यातील जंगल उत्तम मानले जाते. कोका उमरेड, पवनी करांडला अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध असल्याने पर्यटकांची नेहमी वर्दळ राहते.भंडारा शहरातील पांडे महाल हा ऐतिहासीक वारसा म्हणून उभा आहे. त्याची विक्री झाल्याने भविष्यात हा महाल दिसणार की नाही? यात शंकाच आहे.तुमसर तालुक्यातील आंबागड, गायमुख, चांदपूर हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालतात. मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिरापासून सुरु झालेले पर्यटन नरसिंग मंदिर देव्हाडापर्यंत आहे. भंडारा जिल्ह्याला वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. टेकडीवरील मंदिर रमणीय परिसर आहे. भंडारा पासून निघालेले पर्यटक एकाच मार्गावर एक ते दोन दिवसात पाच ते सात ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा आस्वाद घेऊ शकतात.मात्र त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाही. दुसरीकडे पवनी तालुका या बाबतीत आघाडीवर आहे. भंडारा तालुक्यात रावणवाडी तलावापासून गोसीखुर्द, अड्याळ येथील हनुमान मंदिर, गोसेखुर्द धरण, रुयाड येथील बौद्ध स्तुप, पवनी शहरातील प्राचीन मंदिर अशी एक विस्तीर्ण श्रृंखला पर्यटकांसाठी उपलब्ध आहे.मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. जर लक्ष दिले असते तर आज जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असती. स्थानिकांना पर्यटनस्थळामुळे रोजगार मिळाला असता. लोकप्रतिनिधींचे लक्ष केव्हा लागते तर बघू. जिल्ह्यातपर्यटन स्थळाच्या विकासाची वानवा दिसून येते. लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे रोजगार निर्मितीला अडसर ठरत आहे.