शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जिल्ह्यात निधीअभावी पर्यटन विकासाची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:56 IST

जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचे गाजर दाखवून पर्यटनविकासाच्या नावाखाली विकासाची वानवा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन भरभराटीला येण्यासाठी खुंटत चाललेली आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर हा उत्तम नमूना आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी उदासीन : रोजगार निर्मितीलाही अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचे गाजर दाखवून पर्यटनविकासाच्या नावाखाली विकासाची वानवा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन भरभराटीला येण्यासाठी खुंटत चाललेली आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर हा उत्तम नमूना आहे.नदी तलाव वनसंपदा, डोंगररांगा, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा जिल्ह्याला लाभला आहे. कोका, उमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्य, पांडे महाल, चांदपूर, रावणवाडी जलाशय, गोसीखुर्द अशा पर्यटनाला मोठा वाव आहे. परंतु अद्यापही मात्र पाहिजे त्या प्रमाणात सौंदर्यीकरण व दृष्टीकोनातून विकासाचा स्पर्श येथे झालेला नाही. लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळ विकासापासून कोसो दूर आहेत.जर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना चांगल्या प्रकारे विकसीत केले तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मात्र पर्यायाने रोजगार निर्मितीची संधी सुद्धा स्थानिकांसाठी दुरावली आहे.रोजच्या रोज बेरोजगारी वाढत आहे. जिल्ह्यात मोठ्या कंपन्यासुद्धा नाहीत. यामुळे येत्या दिवसात बेरोजगारी तीव्र रुप धारण करणार आहे. यासाठी पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. तीन हजार ७१६ वर्ग कि.मी. क्षेत्रात असलेल्या भंडारा जिल्ह्यात विपूल वनसंपदा आहे. कोका, उमरेड, पवनी करांडला अभयारण्य प्रकल्प आहेत. वॉर्डांच्या अधिवासासाठी भंडारा जिल्ह्यातील जंगल उत्तम मानले जाते. कोका उमरेड, पवनी करांडला अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध असल्याने पर्यटकांची नेहमी वर्दळ राहते.भंडारा शहरातील पांडे महाल हा ऐतिहासीक वारसा म्हणून उभा आहे. त्याची विक्री झाल्याने भविष्यात हा महाल दिसणार की नाही? यात शंकाच आहे.तुमसर तालुक्यातील आंबागड, गायमुख, चांदपूर हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालतात. मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिरापासून सुरु झालेले पर्यटन नरसिंग मंदिर देव्हाडापर्यंत आहे. भंडारा जिल्ह्याला वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. टेकडीवरील मंदिर रमणीय परिसर आहे. भंडारा पासून निघालेले पर्यटक एकाच मार्गावर एक ते दोन दिवसात पाच ते सात ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा आस्वाद घेऊ शकतात.मात्र त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाही. दुसरीकडे पवनी तालुका या बाबतीत आघाडीवर आहे. भंडारा तालुक्यात रावणवाडी तलावापासून गोसीखुर्द, अड्याळ येथील हनुमान मंदिर, गोसेखुर्द धरण, रुयाड येथील बौद्ध स्तुप, पवनी शहरातील प्राचीन मंदिर अशी एक विस्तीर्ण श्रृंखला पर्यटकांसाठी उपलब्ध आहे.मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. जर लक्ष दिले असते तर आज जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असती. स्थानिकांना पर्यटनस्थळामुळे रोजगार मिळाला असता. लोकप्रतिनिधींचे लक्ष केव्हा लागते तर बघू. जिल्ह्यातपर्यटन स्थळाच्या विकासाची वानवा दिसून येते. लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे रोजगार निर्मितीला अडसर ठरत आहे.