शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

सातबारा असूनही दोन महिन्यांपासून धान विक्रीत अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

लाखांदूर : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करतांना शासनाने ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र, सदर नियमाच्या पालनात ...

लाखांदूर : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करतांना शासनाने ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र, सदर नियमाच्या पालनात तालुक्यातील जवळपास ९ शेतकऱ्यांच्या सातबाराचे ऑनलाईन नोंदणीकरण होत नसल्याने केंद्रचालकांची दमछाक होत आहे. दोन महिन्यांपासून या प्रणालीने धान विक्रीत अडथळा निर्माण होऊन शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लाखांदूर तालुक्यात यंदाच्या खरिपात तालुक्यातील तीन सहकारी संस्थांतर्गत जवळपास १४ धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सदर केंद्रात दि. विजयलक्ष्मी सह. संस्थेची ४, खरेदी विक्री सह. संस्थेची ८ व पंचशील भात गिरणीच्या २ मिळून एकूण १४ केंद्रांचा समावेश आहे. सदर केंद्रांतर्गत नियमित शासन नियमानुसार सातबाराची ऑनलाईन नोंदणी करून धान खरेदी केली जात आहे. मात्र, येथील दि. विजयलक्ष्मी राईस मिल सह. संस्थेच्या ४ केंद्रांतर्गत जवळपास ९ शेतकऱ्यांचे सातबारा असूनही ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने केंद्रचालकांची दमछाक होताना शेतकरी धान विक्रीअभावी संतापले आहेत.

विशेष म्हणजे सदर शेतकऱ्यांच्या सातबारामधील अन्य हिस्सेदारांची नावे ऑनलाईन नोंदणीत अद्ययावत असल्याचे दिसून येताना धान विक्रेत्या शेतकऱ्याचे नाव या प्रणालीत अद्ययावत होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पूरपरिस्थिती, कीडरोग व परतीच्या पावसाने यंदाच्या खरिपात लागवडीखालील धान पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने उतारा घसरला आहे. सदर उतारा घसरल्याने उत्पादनातदेखील कमालीची घट झाली आहे. या परिस्थितीत धान उत्पादक शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला असताना उत्पादीत केलेल्या धानाची सातबारा असतानादेखील ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एकंदरीत ऑनलाईन प्रक्रियेत तालुक्यातील ९ पात्र शेतकरी अडकल्याने धान विक्रीपासून वंचित ठरण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. सदर शेतकऱ्यांनी या संबंधाने धान खरेदी केंद्र चालक संस्थेमार्फत जिल्ह्याच्या पणन विभागाला ऑनलाईन प्रक्रियेतील अडथळा दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करूनही संबंधित विभागांतर्गत हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.

याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन सातबारा असतानाही ऑनलाईन प्रक्रियेतील अडथळ्याने धान विक्रीपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी पीडितांनी केली आहे.