शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

लाखांदूर तालुक्यात नदी-नाले झाले वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:59 IST

तालुक्यातून वाहणाऱ्या नदी-नाल्यात पाण्याचा एकही थेंब नसून नदीनाल्यांचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागते. माणसासोबतच जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई : पाण्यासाठी तारेवरची कसरत, जनावरांची पाण्यासाठी भटकंती

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातून वाहणाऱ्या नदी-नाल्यात पाण्याचा एकही थेंब नसून नदीनाल्यांचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागते. माणसासोबतच जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.लाखांदूर तालुक्यातून चुलबंद, वैनगंगा या मोठ्या नद्यांसह अनेक नाले वाहतात. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे नदी - नाले आता कोरडे झाले आहे. विशाल पात्र असलेली वैनगंगाही कोरडी पडली आहे. चुलबंद नदीतही पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे नदीपात्र वाळवंटासारखे दिसत आहे. तालुक्यातील तलाव आणि बोड्यांनीही तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील जलस्त्रोत झपाट्याने खाली जात आहे. परिणामी गावागावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, बोअरवेल, हातपंप आदी जलस्त्रोत आटले आहे. अनेक ठिकाणी पाणी असले तरी गाळयुक्त आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी आबालवृद्ध पहाटेपासून भटकंती करतात. पाणीटंचाईचा फटका जनावरांनाही बसत आहे. अनेक गौपालक जनावरांच्या पाण्याची तजवीज करताना मेटाकुटीस आले आहे. गायी, म्हशी आदी जनावरे पाळावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.वाढत्या तापमानाचा बसतोय फटकालाखांदूर तालुक्यात तापमान प्रचंड वाढले आहे. सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जलस्त्रोत झपाट्याने खाली जात आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून नागरिकांना पाण्यासाठी प्रशासनाची विणवणी करावी लागत आहे

टॅग्स :water shortageपाणीटंचाई