शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

घरकूल लाभापासून वंचित

By admin | Updated: June 13, 2015 00:40 IST

अपंग व्यक्तींना इंदिरा आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही ...

व्यथा अपंग लाभार्थ्यांची : सूचनेचाही अभाव तुमसर : अपंग व्यक्तींना इंदिरा आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही आदेशाला बगल देत अपंगाना घरकूल योजनेचा लाभ देण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे.दारिद्रय रेषेखालील नागरिकांना हक्काचे घरकूल देणाऱ्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत मानसिक व शारिरीक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीला घरकूल देण्यासंदर्भात केदं्र शासनाचे स्पष्ट दिशानिर्देश असतानाही प्रत्यक्षात मात्र अपंगाना इंदिरा आवास योजनेत डावलल्या गेल्याचे धक्कादायक वास्तव सामोर आले आहे. याबाबद आता राज्य शासनाने नविन आदेश काढून इंदिरा आवास योजनेअंतर्गत वंचित अपंगाची प्रतिक्षा यादी तयार करुन त्यांना घरकूल देण्याची मागणी येथील अंपग बांधवांनी केली आहे. इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून अपंगाना घरकूल लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने काही दिशा निर्देश दिले आहेत. यात अपंग शारीरिक किंवा मानसिक हा कमित कमी चाळीस टक्यापेक्षा कमी नसावा असा अपंगाना प्राधान्य देण्याच्या सुचना केंद्रशासनाच्या आहेत. मात्र याबाबत राज्य शासन व प्रशासन गंभिर नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र अपंग लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत नाही. केंद्र शासनाने सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी जे दिशा निर्देश दिले आहेत. त्यामध्ये विधवा, परिपक्त्या तथा कठिण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या महिला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असणारे मानसिक, शारीरिक अपंग तसेच सशस्त्र कारवाईत जीव गमाविलेल्या सैनिक व पोलिसांना इंदिरा आवास योजनेत घरकुल देताना प्राधान्य देण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्हयात व तालुक्यात अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगाना घरकुल देण्याबाबतची सुचना देण्यात आली नाही. त्यामुळे केंद्राचे आदेश असतांनाही अधिकाऱ्याचा अज्ञानामुळे व हलगर्जीपणामुळे अपंगाना घरकुलपासून वंचित राहावे लागत आहे या महागाईच्या काळात चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगाना घरकुल बांधणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. बऱ्याच प्रमाणात अपंगांना निवारा नसल्याने उघड्यावरच जिवन जगत असल्याचे विदारक चित्र आहे. मात्र राज्य शासनाच्या तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगाना घरकुल देण्याबाबत आदेश नसल्याने अपंगाना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. नविन अध्यादेश काढून इंदिरा आवास योजनेत अपंगाकरिता घरकूल मिळवून दयावे अशी मागणी अपंग संघटनेनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)