शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:28 IST

कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले.

ठळक मुद्देवडेगाव केंद्रावरील प्रकार : शेतकरी हतबल, संबंधितांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. हा प्रकार येथील खरेदी-विक्री समितीच्या वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केद्रावर घडला. या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.प्राप्त माहितीनुसार, वडेगाव-रेल्वे येथे वडेगाव, कन्हाळगाव व घाटी पळसगाव येथील शेतकºयांचे धान खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकºयांनी शासकीय धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करावे. खासगी व्यापाºयांना विक्री करू नये असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार खुणे यांनी आपल्या शेतात उत्पादीत धान वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेले.सोबतच बिदान या वाणाचे धान आणखी काही शेतकºयांनी नेले. इतर शेतकºयांच्या धानाची मोजणी ग्रेडरने केली. मात्र खुणे यांच्या धानाची मोजणी केली नाही. जिल्हा विपणन अधिकारी व ख.वि.समितीचे व्यवस्थापक सुरेश गंथडे यांनी धान निकृष्ट दर्जाचे आहे, इतरत्र विक्रीची व्यवस्था करा असे खुणे यांना सांगीतले.शेतकºयांची यावर्षी परिस्थिती अत्यंत खराब आहे. अल्पवृष्टी, कीड व वादळाने धान नेस्तनाबूत केले. त्यामुळे धानाचा दर्जा खालावलेला आहे. अस्मानी संकटाने शेतकºयांना दगा दिला. मात्र आता हा धान विक्री होत नसल्याने बळीराजासमोर मोठे सुलतानी संकट उद्भवले आहे. युती सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे म्हटले जाते. मात्र शासकीय धान खरेदी केंद्राकडून धान खरेदी केली जात नाही. शेतकºयांनी आपली कैफीयत मांडायची कुणाकडे हा गंभीर प्रश्न आहे. याच धान खरेदी केंद्रावर काही शेतकºयांचे यापेक्षा निकृष्ट दर्जाचे धान खरेदी करण्यात आले. खरेदीत दुजाभाव केला जात असल्याचा खुणे यांचा आरोप आहे.आधीच जर्जर झालेल्या शेतकºयांनी स्वत:चे पैसे खर्च करून घरापासून अथवा शेतापासून तर धान खरेदी केंद्रापर्यंत वाहतुकीचा खर्च करायचा. नंतर ग्रेडरच्या सांगण्यावरून पैसे खर्च करून पुन्हा घरी परत घेऊन जायचे अथवा नाईलाजास्तव अल्पदरात व्यापाºयाला विकायचे या प्रकारामुळे खुणे यांना मनस्ताप झाला असून त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे.धान खरेदी करणाºया संस्थाच शेतकºयांना व्यापाºयाला धान विकण्यासाठी बाध्य करतात असा आरोप खुणे यांनी केला आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी व शासन शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध करून दाखवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.ग्रेडरची नियमबाह्य नियुक्तीधान खरेदी केंद्रांवर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील गे्रडरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या परिसरात उस, कापूस, कांदा, मका व द्राक्षांची लागवड होते. त्यांना धानाचे वाण काय समजणार असा सवाल खुणे यांनी केला आहे. धान खरेदी केंद्रांवर धान उत्पादक परिसरातीलच ग्रेडरची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापक गंथडे यांच्याशी चर्चा केली असता, ग्रेडर कोणत्या परिसरातील आहेत याची आपणास माहिती नसल्याचे सांगीतले. खुणे यांचे धान निकृष्ट दर्जाचे असल्याने अचानक दौºयावर असलेल्या जिल्हा विपणन अधिकाºयांनी खरेदी करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगीतले.