शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:28 IST

कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले.

ठळक मुद्देवडेगाव केंद्रावरील प्रकार : शेतकरी हतबल, संबंधितांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. हा प्रकार येथील खरेदी-विक्री समितीच्या वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केद्रावर घडला. या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.प्राप्त माहितीनुसार, वडेगाव-रेल्वे येथे वडेगाव, कन्हाळगाव व घाटी पळसगाव येथील शेतकºयांचे धान खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकºयांनी शासकीय धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करावे. खासगी व्यापाºयांना विक्री करू नये असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार खुणे यांनी आपल्या शेतात उत्पादीत धान वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेले.सोबतच बिदान या वाणाचे धान आणखी काही शेतकºयांनी नेले. इतर शेतकºयांच्या धानाची मोजणी ग्रेडरने केली. मात्र खुणे यांच्या धानाची मोजणी केली नाही. जिल्हा विपणन अधिकारी व ख.वि.समितीचे व्यवस्थापक सुरेश गंथडे यांनी धान निकृष्ट दर्जाचे आहे, इतरत्र विक्रीची व्यवस्था करा असे खुणे यांना सांगीतले.शेतकºयांची यावर्षी परिस्थिती अत्यंत खराब आहे. अल्पवृष्टी, कीड व वादळाने धान नेस्तनाबूत केले. त्यामुळे धानाचा दर्जा खालावलेला आहे. अस्मानी संकटाने शेतकºयांना दगा दिला. मात्र आता हा धान विक्री होत नसल्याने बळीराजासमोर मोठे सुलतानी संकट उद्भवले आहे. युती सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे म्हटले जाते. मात्र शासकीय धान खरेदी केंद्राकडून धान खरेदी केली जात नाही. शेतकºयांनी आपली कैफीयत मांडायची कुणाकडे हा गंभीर प्रश्न आहे. याच धान खरेदी केंद्रावर काही शेतकºयांचे यापेक्षा निकृष्ट दर्जाचे धान खरेदी करण्यात आले. खरेदीत दुजाभाव केला जात असल्याचा खुणे यांचा आरोप आहे.आधीच जर्जर झालेल्या शेतकºयांनी स्वत:चे पैसे खर्च करून घरापासून अथवा शेतापासून तर धान खरेदी केंद्रापर्यंत वाहतुकीचा खर्च करायचा. नंतर ग्रेडरच्या सांगण्यावरून पैसे खर्च करून पुन्हा घरी परत घेऊन जायचे अथवा नाईलाजास्तव अल्पदरात व्यापाºयाला विकायचे या प्रकारामुळे खुणे यांना मनस्ताप झाला असून त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे.धान खरेदी करणाºया संस्थाच शेतकºयांना व्यापाºयाला धान विकण्यासाठी बाध्य करतात असा आरोप खुणे यांनी केला आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी व शासन शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध करून दाखवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.ग्रेडरची नियमबाह्य नियुक्तीधान खरेदी केंद्रांवर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील गे्रडरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या परिसरात उस, कापूस, कांदा, मका व द्राक्षांची लागवड होते. त्यांना धानाचे वाण काय समजणार असा सवाल खुणे यांनी केला आहे. धान खरेदी केंद्रांवर धान उत्पादक परिसरातीलच ग्रेडरची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापक गंथडे यांच्याशी चर्चा केली असता, ग्रेडर कोणत्या परिसरातील आहेत याची आपणास माहिती नसल्याचे सांगीतले. खुणे यांचे धान निकृष्ट दर्जाचे असल्याने अचानक दौºयावर असलेल्या जिल्हा विपणन अधिकाºयांनी खरेदी करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगीतले.