शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत डेंग्यूने सहा जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 16, 2016 00:41 IST

डासांपासून होणाऱ्या ‘डेंग्यू’ या जीवघेणा आजाराचा मागील दोन वर्षांत १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण दिवस आज : केंद्र सरकारच्या निर्देशानंतर आरोग्य विभाग करणार जिल्ह्यात जनजागृतीभंडारा : डासांपासून होणाऱ्या ‘डेंग्यू’ या जीवघेणा आजाराचा मागील दोन वर्षांत १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानंतर भंडारा जिल्हा आरोग्य विभागाने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे.केंद्र सरकारच्या कीड नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संवेदनशील गावात जनजागृतीसाठी प्रभावी योजना आखण्यात आली आहे. त्याअनुषंगाने १६ मेपासून राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती रॅली आयोजित करणे आणि डास निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती करणार धूरफवारणी ग्रामपंचायतींना त्यांना मिळणाऱ्या निधीतून धूर फवारणी मशिन खरेदी करणे आणि त्याचा नियमित उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सेवा विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी डेंग्यू या आजाराचा उद्रेक होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले आहे. याशिवाय संवेदनशील भागात डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभागातून जनजागृती हे प्रभावी असून जिल्ह्यात या आजारांमुळे ३६ गावे संवेदनशील आहेत. या गावात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या अभियानात डेंग्यूपासून बचाव करणे, डासांची पैदास रोखणे, कोरडा आठवडा पाळणे व डासांपासून आजार रोखण्यावर भर दिला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी सांगितले.वर्षभरात सुक्ष्म नियोजन डेंग्यू या आजारावर नियंत्रणासाठी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात डेंग्यूशिवाय डास व किटकापासून होणारे हिवताप, मेंदूज्वर, चंडीपुरा, चिकनगुनिया या आजाराच्या निर्मूलनासाठी आरोग्य केंद्राच्यास्तरावर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने ‘इंडिया फाईट्स डेंग्यू’ अ‍ॅप सुरू केले आहे. त्या धर्तीवर भंडारा आरोग्य विभागाने ‘एनव्हीबीडीसीपी’ या नावाने ग्रुप बनविला आहे. त्या माध्यमातून या आजार निर्मूलनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. डी. झलके यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात १२ वेळा झाला होता उद्रेक डासांपासून होणारा ‘डेंग्यू’ हा जीवघेणा आजार आहे. मागील दोन वर्षात या आजाराचा १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा जीव गेला. २०१४-१५ या वर्षात डेंग्यूचा ११ ठिकाणी उद्रेक झाला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी ५५५ रूग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६५ रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला होता. डेंग्यू या जीवघेण्या आजाराची भयावहता लक्षात घेता जिल्ह्यातील संवेदशील ३६ गावात डेंग्यू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. सन २०१५-१६ या वर्षात डेंग्यूचा केवळ एक उद्रेक नोंद करण्यात आला. यावेळी २३ जणांचे रक्तनमुने तपासणीठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. या वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक झाला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.