शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

पालांदूर : जिल्ह्यात कोरोनाचे संकट कमी झाले आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे. यामुळे एक ते सातचे वर्ग नियमित ...

पालांदूर :

जिल्ह्यात कोरोनाचे संकट कमी झाले आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे. यामुळे एक ते सातचे वर्ग नियमित सुरू करण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे. शाळा बंद असल्याने लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने अभ्यासाची सवय तुटत आहे. मुले शिक्षणापासून दूर जात आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात बरीच मुलं नदी, नाल्यांकडे फिरण्याच्या बहाण्याने जात असल्याने धोका वाढला आहे. शाळा सुरू झाल्यास शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहतात; मात्र शाळा बंद असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभागाने लक्ष देऊन वास्तव परिस्थिती लक्षात घेत स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करायला हरकत नसावी, असा सूर पालकांतून निघत आहे. स्मार्टफोनच्या नादात विद्यार्थ्यांना मोबाईलचे अतोनात वेड लागले आहे. टी.व्ही (दूरदर्शन) अर्थात टेलिव्हिजन नाही तर फोनलाच विद्यार्थ्यांची पसंती आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. प्रायमरीचे विद्यार्थी तर शिक्षणापासून दूर राहत असल्याने नेहमीचा अभ्यासही विसरलेले आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. वर्ग आठ ते बारा शाळा सुरूच आहेत. त्यांचाच मागोवा घेत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुद्धा सुरू कराव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यार्जनाकरिता शैक्षणिक वातावरण मिळेल. पालकांची चिंता कमी होऊन सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यात मोठी मदत होईल. कोरोनाच्या नियमात शाळा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

बॉक्स

शासन निर्णयाकडे लक्ष

काही गावात तत्पर शिक्षणप्रेमी शिक्षकांनी पालकांच्या परवानगीने शाळा सुरू केल्या आहेत. मात्र अधिकारी वर्गाकडून रीतसर परवानगी नसल्याने कारवाईचे भय कायम आहे. सणासुदीत शाळा बंद असल्याने मुलांचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे. शासन स्तरावरून किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अजूनपर्यंत तरी शाळा सुरू करण्याचे निर्देश मिळालेले नाहीत. जोपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश येणार नाही. तोपर्यंत शाळा सुरू करता येणार नाही अशी माहिती जिल्हा परिषद भंडाराचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांनी दिली.

कोट

ग्रामीण भागात कोरोनाचे बिलकुल भय राहिलेले नाही. पोरं दिवसभर खेळतात. पावसाचे दिवस असल्याने ओले होत सर्दी खोकल्याचा त्रास ओढवून घेतात. शिस्त राहिलेली नाही. पालकांचे मुले ऐकत नाही. शिक्षकांचा धाक व शैक्षणिक वातावरण बालवयात अत्यंत महत्त्वाचे आहे.

कांचन राठोड, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, पालांदूर.