शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी

By admin | Updated: March 12, 2015 00:22 IST

कुंभार समाजाच्या मागण्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतरही मागण्या सोडविण्यात आल्या नाही. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे.

भंडारा : कुंभार समाजाच्या मागण्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतरही मागण्या सोडविण्यात आल्या नाही. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे. समाज बांधवांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवून ८० लाख समाज बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान व गोवा या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र मातीकला महामंडळ स्थापन करण्यात यावे, समाजाचा भटक्या विमुक्त जमाती या प्रवर्गात समावेश करावा, कुंभारखानी समाजाला त्वरीत बहाल कराव्या, विधानपरिषदेत समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, व्यवसायासाठी अग्रक्रमाने शासकीय जागा उपलब्ध करून द्याव्यात, मातीवरील रॉयल्टी माफीबाबतचे व समाजातील विट व्यवसायीकांना आवश्यक परवाना बाबतचे स्पष्ट निर्देश सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात यावे, ६५ वर्षावरील निवृत्त कारागीरांना तीन हजार रूपये महिना मानधन देण्यात यावे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये कुंभारकला प्रशिक्षण सुरू करण्यात यावे, एमआयडीसी क्षेत्रात कुंभार व्यवसायीकांना अग्रक्रमाने जागा देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्यासंदर्भात वर्धा येथे आयोजित कुंभार समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापनेची घोषणा केली होती. मात्र समस्या जैसे थे आहे. समाज बांधवांच्या प्रलंबित समस्यांकडे लक्ष देण्याची मागणीही निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात आरिफ पटेल, रमेश बुरबादे, गोविंद ठाकरे, सुरेश रूद्राक्षवार, गोपाल घाटेकर, श्रीधर पाठक, शरद चिकाने, अमर बोरसरे, गरीबचंद मालदे, प्रदीप पाठक, ईश्वर खोबरे, हितेश वरवाडे, श्यामलाल ठेकले, मनिराम घाटे, देवचंद कुंभरे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)