शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ओबीसी जनगणनेची मागणी व जनजागृती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST

भंडारा : ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. केंद्र सरकारने जनगणना २०२१चा ...

भंडारा : ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. केंद्र सरकारने जनगणना २०२१चा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याबाबत नमुना चाचणी ऑगस्ट, २०१९ला करण्यात आली होती. त्या नमुना प्रश्नावलीत ओबीसी समाजाच्या जगण्याबाबत उल्लेख नव्हता. ओबीसी क्रांती मोर्चा भंडाराच्या वतीने मकर संक्रांतीला सणानिमित्ताने जनगणना २०२१ मध्ये ओबीसीच्या कॉलम नाही, म्हणून जनगणनेत ओबीसी समाजाचा सहभाग नाही, असा संदेश पतंगीवर लिहून आकाशात पतंग उडवत, ओबीसी प्रवर्गामार्फत सरकारला ओबीसी जनगणनेची मागणी व जनजागृतीसाठी उपक्रम संकल्पना निमित्त राबविण्यात आले.

स्वातंत्र्यपूर्वकाळात १९३१ला ओबीसीची जनगणना झाली होती. त्यानुसार, देशात ओबीसी समाजाची संख्या ५२ टक्के होते. ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाच्या जाणीवपूर्वक आघात करत डावलण्यात आले. ओबीसी समाजात मोठा असंतोष आहे. जनगणना २०२१ मध्ये ओबीसीचा कॉलम नाही, म्हणूनच आमचा सहभाग नाही, डॉक्टर अंजली साळवे विटणकर यांनी पाटी लावा मोहीम सुरू केली. ओबीची क्रांती मोर्चा महाराष्ट्र भंडारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून घराघरावर पाटील लावा मोहीम सुरू आहे. मकर संक्रांतीला पाटीचे वाण देऊन ही मोहीम ओबीसी जनगणना याबाबत जागृतीसाठी राबविण्यात आली आहे. उपक्रमांतर्गत क्रांती मोर्चा मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते, अमरदीप भुरे, जीवन भजनकर, किरण मते, शोभा बावनकर, राजेश इसापुरे, पुरुषोत्तम नंदुरकर, यशवंत सूर्यवंशी, सुधाकर कावळे, नितीन नागदेवे, नकुल मते, मारुती राऊत, कल्याणी मते, काजल ठवकर व विद्यार्थी उपस्थित होते.